Thursday, October 20, 2011
“मैं कौन हुं ?”
Tuesday, October 4, 2011
सिनेमे जलन ....
Bf : सिनेमा पाहायला जाउयात ?
gf : हो जाऊ ना !
Bf : कुठला ? एखादा छान romantic ? तुला आवडतात ना तसे ..
Gf : वेडा-बिडा झालायेस का? आवडायचे !!! आता नाही...
bf : मग आता ?
GF : ढिशुम ढिशुम वाले ...सलमान,अजय,जॉन,...moustache
men !!!! bf : OK (मिसुर्डा हि ना फुटले
ला चेहऱ्यावरून रुमाल फिरवत ...) तर मित्र हो हि वेळ आलेली आहे.. मुलांनी माधुरी,राणी,ऐश्वर्या ह्यांना पाहण्यासाठी (खरा कारण वेगळा आहे ) सिनेमाला जायचे दिवस आता गेले..आता
Action films are back !!! Moustache men are
roaring ! bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster !!!
सध्या जो बघेल तो ढिशुम-ढिशुम चे सिनेमे काढतोय..न ते चांगला धंदा पण करतायेत..जॉ
न अब्राहम चा 'फोर्से' नामक सिनेमा सध्या गाजतोय..थोडक्यात मारामारीयुक्त ची चांदी होतीये...इतकाच काय तर आपला 'romance king ' SRK पण पुढचे २ सिनेमे मारामारीचेच घेऊन येतोय ...तर मुद्दा हा आहे कि मला सिनेमांची खूप आवड आहे..typical हिंदी सिनेमे..आणि अगदी लहान पणापासून मी theatre मध्ये जाऊन सिनेमे पाहिलेत
( आभार : आई-बाबा,स ना वि वि )....म्
हणजे मला कळायला लागल्यापासून मी सिनेमे पहिल्याचा मला आठवतंय.. मुळातच फालतू विषयांवर चर्चा करणे आणि फुकट वेळ घालवणे हे आवडते काम असल्यामुळे हे सिनेमे इतके का पैसे कमवू लागले न त्याही पेक्षा लोकांना का आवडू लागलेत ह्याचा विचार खूप डोक्यात घोळू लागला..
तर ह्या गोष्टीची सुरुवात होते १९३० पासून ...जेव्हा बरेच चे सिनेमे हे संत पट होते, किंवा स्वातंत्र्याशी निगडीत होते ( directly or indirectly )..
त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला न सगळा छान छान वाटू लागला...१५० वर्ष बोर्डिंग स्कूल मध्ये राहिल्यावर सकाळी आपल्या घरी आपल्या बेड वर झोपेतून उठल्यावर जसा वाटता ना तसा..ह्याचे प्रतिबिंब सिनेमान मध्ये सुधा दिसले.. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाला ..सगळा कसा छान छान होणारे..फील गुड होता सगळीकडे..सिनेमे सुधा तोच फील continue करू लागले..लोकांना स्वप्ना दाखवणारे सिनेमे सुरु झाले..देव आनंद,दिलीप कुमार,शम्मी कपूर,राजेंद्र कुमार असे सगळे मिशी नसलेले हिरो लोकांना आवडू लागले..प्रेम कहाण्या,काश्मीर चे locations , college मध्ये नेहमी पहिला येणारा हिरो,मा का लाडला बेटा, बेहेन का प्यारा भैय्या ,नोकरी करणारा..काही अपवाद होते त्यातला एक मिशीवाला म्हणजे राज कपूर आणि दुसरा म्हणजे गुरु दत्त ..ह्या दोघांनी जरा वास्तविक सिनेमे केले..समाज,ग्रामीण समस्यांशी निगडीत गोष्टी सांगितल्या..हे साधारण १९६० च्या दशकात घडत होता..हरित क्रांती सारखे उपक्रम घडल्यामुळे भूक बळींची संख्या कमी झाली.."सुजलाम सुफलाम " ह्या घोषणा ऐकू येऊ लागल्या.. हा तेव्हा काही मारामारी सिनेमे पण निघाले पण ते भारत- चीन युद्ध ह्या वर आधारित होते..त्या व्यतिरिक्त मारा मारी म्हणजे तोंडाने "ढिशुम ढिशुम " असा आवाज काढून प्राण,प्रेम नाथ,प्रेम चोप्रा ह्यांना मारण्या पुरताच मर्यादित होती..त्यातूनच राजेश खांना नामक अजून एक बिगर मिशी वाला तरुण लोकांपुढे उभा राहिला आणि बाकी सगळ्यांना आडवा पडला..पोरी त्याच्या मागे फिदा होत्या.."superstar " हि ख्याती मिळवणारा हा पहिले हिरो..
१९७० ची सुरवात होती.. स्वातंत्र्य मिळून २५ वर्ष झाली होती.. पण नेहरू-शास्त्रींनी बघितलेली स्वप्ना पूर्ण होताना दिसत नव्हती..अन्नाचा उत्पादन वाढला होता पण रेशन मध्ये भ्रष्टाचार पण वाढला होता..
इंदिरा गांधी सत्तेवर आली आणि socialist mindset ने सरकार चालवू लागली.. तरुण लोकांना स्वप्ना दाखवली गेली होती.पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांना ज्या संध्या मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या...सगळा छान होणार हे केवळ एक मृगजळ वाटू लागला होता.. एक आग आत मध्ये धुस्मात होती.. एक घुसमट होती,मनात एक चीड होती,license raj मुले तरुण उद्योजक हैराण झाले होते... JRD TATA पण ह्याला अपवाद नव्हते.. त्यांच्या 'महाराजा' ला देखील शरण यावा लागला होता..(आज त्याची काय अवस्था झा
लीये हे आपण पाहू शकतो )....
तो बुळबुळीत पण,खोटा गोड गोड वा
गणं ,ह्यातून एक frustration बाहेर पडणार होता न ते पडला देखील..ते सिनेमातही दिसला..अमिताभ ची अंग्री युंग मन image , गुलझार चा मेरे अपने, सलीम-जावेद चा दिवार,शोले ,त्रिशूल,काला पथर ,शत्रुघन सिंह चा "खामोश" हा त्या भावना व्यक्त करत होता... कॉलेज मध्ये पहिले येणारे हिरो आता रस्त्यावरचे बूट पोलिश करणारे झाले..लहानपाणी एका पोळीचा तुकडा चोरताना पाळणारा मुलगा धावता धावता एक दागिना लुटून पाळणारा हिरो झाला.. पोलीस मागेच असतात..त्यातूनच emergency सारखे कलंक आपल्यावर फासले गेले..हीच स्तिथी १९८० मध्ये पण होती..सिनेमा अजून थोडा वास्तववादी झाला..ओम पुरी चा अर्ध सत्य असो किंवा नाना पाटेकरचा अंकुर..सनी देओल चा अर्जुन,घायल असो..चीड मनात होतीच...आणि ती पडद्यावर दिसत होती..लोकांना ते आपलासा वाटत होता....१९८० चा शेवट आणि भारत कर्ज बाजारी झाला..पण त्या अंधारा मधेच एक आशेचा किरण दिसला..यशवंत सिंह ने आपली आर्थिक धोरण बदल्याचे पाऊल टाकले आणि ते नव्या पिढीला खूप उर्जा देऊन गेले..त्याच सुमारास अनिल कपूर ,जाकी श्रॉफ ह्या मिशी वाल्यांच्या मध्ये आमीर आणि सलमान हे बिगर मिशी वाले हिरो 'कयामत से कयामत तक' आणि " मैने प्यार किया " असे प्रेम कहाण्या घेऊन आले...आपला रोमान्तिक शाहरुख सुधा TV वर हात पाय मारतच होता...
आणि अखेर तो दिवस उजाडला..२० जून १९९१ भारताचा दुसरा स्वन्तान्त्र्या दिवस..मनमोहन ,मोन्टेक आणि चिदंबरम ने नवीन आर्थिक धोरण स्वीकारला..LPG (liberalisation ,privatisation ,globalisation ) ने भारताचा बाजार दुसर्या देशांसाठी खुला केला..
गुंतवणूक वाढली, उद्योजकांना प्रोत्साहन दिला.. पुन्हा सगळा छान छान होणार असा वाटू लागला..
IT ची झेप डोळे दिपवणारी होती...मध्यम वर्गीय माणूस आता mall , विमान, परदेश वारी ची स्वप्ना पूर्ण करू लागला...इकडे सिनेमान मध्ये आमीर,सलमान आणि शाहरुख पुन्हा स्वप्ना दाखवू लागले..
काश्मीर ची जागा आता switzerland नि घेतली..फुल blouse ची जागा आता स्लीवेलेस ने घेतली..विमानातून उतरणारा राहुल..पोरींना वेडा करू लागला..शांत प्रेम मुलींच्या प्रेमाच्या अपेक्षा वाढवू लागला... आता फरक फक्त एवढाच होता कि हिरो हा कॉलेज मध्ये उशिरा येणारा , नापास होणारा,पार्ट्य करणारा पण देवळात जाणारा,घरच्यांचा मान राखणारा असा portray होऊ लागला त्यामुळे सर्व सामान्य मुला देखील वेडी झाली....
१९९० चा दशक ह्याचा पुरावा होता.. DDLJ , HMHK ,KKHH ,DTPH असे सिनेमे तरुणाई ला त्या प्रवाहात ओढू लागले..
परत सगळा छान छान होणार असा वाटत असताना भ्रष्टाचार, बोंब स्फोट,दंगली,terrorist attack ..सुरु झाले..शिक्षण संस्था खूप सुरु झाल्या पण वशिले बाजी पण तितकीच बळावली..पैसे दिले कि काम होतात, पास होऊ,degree मिळेल ह्या सगळ्या मुले मध्यम वर्गीय सुशिक्षित तरुण हा बेरोजगार राहू लागला... हळू हळू frustration वाढू लागला..पुन्हा तीच चीड सुरु झाली....
मुंबई सारख्या शहरावर अनेक वेळा रेप केले गेले तरी मुंबई स्पिरीट च्या नवा खाली सगळ्या भावना मारल्या गेल्या..दुसर्या दिवशी नोकरीला ला गेलो नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही ह्या भीतीने माणूस कामावर जाऊन लागला..कसला आलाय मुंबई स्पिरीट....
IT नि घेतलेली झेप २००२ मध्ये फटाका चा रोकेट कसा परत खाली येत ना तसा खाली आला..अनेक लोक पुन्हा बेरोजगार झाले..२००८ च्या मंदी ने तर कळस गाठला .. आपल्या कुवती पेक्षा जास्त कर्ज घेऊन स्वताचीच मारून ठेवली..आधी फक्त नोकरी नव्हती आता तर गहर हि जायची वेळ आली होती..परदेशात जाऊन शिकायची craze अंगावर आली..
परत सगळी चीड वाढली...मग प्रेम कहाण्या करणारे आमीर,शाहरुख आणि सलमान मिशी वाढवू लागले...त्याला साथ दिली अजय,अक्षय,जॉन ह्यांनी..
स्वप्ना चिरडली जाऊ लागली ...सगळी घुसमट पुन्हा बाहेर पडू लागली...सिनेमान मध्ये आग दिसू लागली...सिनेमाने ते ओळखला आणि त्यात पैसा कमवू लागले...त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster ..
सलमान झाला,आमीर झाला,अजय झाला ...आता लोक वाट बघतायेत शाहरुख ची ...
आणि मी वाट पाहतोय तिसर्या स्वातंत्र्याची आणि माझी मिशी वाढण्याची !!!
आशय