Wednesday, November 2, 2011

'MEN’tality !



आज दिवाळी पहाट..आणि मी एक अस्सल पुणेकर असल्याच कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पहाटे ४.३० ला सारस बागेत आलोय...तस मी गेले ४ वर्ष इथे येतोय..पण आज विशेष होता...
आलो त्या वेळी अजून अंधारच होता ...पण एक वेगळीच प्रसन्नता होती वातावरणात ..सगळीकडे पंत्यानंचा एक नेत्रदीपक असा अविष्कार पाहायला मिळत होता ..कोणी त्या पणत्यांनी एक ोठी पणती बनवली होती तर कोणी त्यांचा आकाशकंदील केला होता ...कोणी शुभ दीपावली लिहिला होता तर कोणी "मेरा भारत महान !" (का ते माहित नाही ).जवळच एक stage बांधला होता आणि काही वेळातच मराठी ाण्यांचा कार्यक्रम सुरु होणार होता ...त्या रोषणाई मध्ये अत्तरांचा
सुगंध दरवळत होता ...एरवी deo च्या वासाची वय झालेल्यांना अत्तराचा सुगंध म्हणजे रोज chicken burger खाणार्यांना अस्सल गावरान कोंबडी चा वास येण्यासारखा आहे ..डोळे अपोआप बंद होतात आणि तो वास मेंदू मध्ये फीड होईपर्यंत घेत राहतात ..एक वेगळीच सुचीर्भूतातता ,प्रसन्नता ...तसाही अंधार असल्यामुळे डोळ्यांचा काही उपयोग होत नव्हता ..साधारण तासभर त्या रोषणाईत फिरून झाला होता ...
त्या stage वरून एक निवेदन झाला आणि गाण्याचे स्वर कानावर ऐकू येऊ लागले ...श्रीधर फडक्यांचा " तुला पहिले मी नदीच्या किनारी ...तुझे केस पाठीवरी मोकळे " ..
शब्द कानावर पडताच ..डोळे अजून घट्ट बंद झाले आणि एक वर्ष मागे गेला ...आठवणीत !...


अशीच एक दिवाळी पाहत होती गेल्यावर्षीची ...असाच मी पाहते 5.३० ला आलो होतो ...मित्रांनी एकाच गोष्ठी चा आमिष दाखवून मला सरस बागे पुन्हा बोलावला होता ..मी अत्यंत नाराजी ने आलो होतो . .अंधारात मला काही दिसत नव्हता ...मी as usual वेळ पाळणारा असल्यामुळे आपल्या मुळे उशीर नको व्हायला म्हणून दबंग स्नान उरकून येऊन बसलो होतो ..पण कोणीच आलेला नव्हता ..त्यामुळे चीड चीड झाली होती ..नुसता बसून तरी काय करायचा म्हणून ते दिवे पाहत
जांभया देत फिरत होतो ..शेवटी एका ठिकाणी येऊन थांबलो ..तासभर झाला तरी अज्जून कोणाचा पत्ता नव्हता ..जवळच बांधलेल्या stage वर mic testing चा कर्कश्य आवाज येत होता .. मानसिक त्रासात अजून भर पडत होती ...तसा मी रागावर नियंत्रण ेवायला शिकलोय ..नाहीतर 3 वर्ष एकाच IT कंपनी मध्ये काम नसतो कर शकलो ... छान झोप सोडून ,मित्रांच्या आमिष पोटी मी इथे single मुलगा पाडव्याला जिथे maximum जोडपी येतात अशा ारसबागेत येऊन उभा होतो .. mic testing चा आवाज अजून वाढल्याने मी डोळे मिटले आणि कान पण बंद केले ..काही क्षणातच एक गाणं सुरु झाला .."तुला पहिले मी नदीच्या किनारी ...तुझे केस पाठीवरी मोकळे .." जरा सुसह्य वाटला म्हणून आधी कानावरचा हात काढले .अंधाराची जागा आता प्रकाशाने घेतली होती ..उजाडायला लागला होता ..एकदम उजेड झाल्यामुळे डोळे पटकन उघडले नाहीत ...हळू हळू डोळे उघडले तर समोरच 3-4 मुलींचा घोळका उभा होता ...त्यातली एक माझाकडे पाठ रून उभी होती आणि बाकीच्या तिच्या शी बोलत होत्या ..त्यामुळे centre ऑफ attraction तीच होती ..तिचे केस लांब होते आणि मोकळे सोडलेले होते ...सलवार
कुर्ता होता ..मोरपंखी रंगाचा ...तिचा चेहरा पाहण्याची इच्छा झाली ...न काय आश्चर्य ..दुसर्या क्षणी ती मागे फिरली माझा कडे पाहून हसली
hi ! केला ...मला काही सुधरलाच नाही पण प्रसंगावधान राखून मी ुधा हसलो ! पण सकाळी लवकर यायच्या नादा brush करायचा राहून गेला हे आठवल्या क्षणी मी माझा हसणं थांबवला ..न तोंड बंद केला .. बाल
हनुमानासारखा चेहरा करून उभा राहिलो ..पण नंतर माझा तल्लख बुद्धीने मला " अरे एका दिवशी दात नाही घासले तर दात लगेच पिवळे होत
नाहीत !" असा सुचवल्यावर माझी बत्तीशी पर बाहेर काढली ...हे झाल्यावर मी आता Hi ! साठी माझा हाथ उचलणार इतक्यात माझ्या मागून एक मुलगी आली आणि तिने
त्या समोरच्या ललनेला मिठी मारली ...माझा हत्ती झालाय हे माझा लक्षात आले
(हत्ती म्हणजे मोठा पोपट होणे !!)..मी पटकन मान खाली घातली आणि खिशातून mobile बाहेर काढला त्यावर उगाच buttons दाबत बसलो (आपण busy आहोत किंवा काहीतरी msg आलाय हे उगाच दाखवण्यासाठी !)... मी खालीच पाहत होतो ..mobile
च्या screen वर ..पण आता मला तिचा चेहरा त्यात दिसत होता ...मी डोळे मिटून परत उघडले तरी तेच ..mobile पण switchoff करून पहिला तरी तेच ...मला काय झालाय हे समजायल फार वेळ नाही लागला ...लांब केस (माझे विसकट लेले ), टप्पोरे डोळे (मला चष्मा ),उंची 5'4" (मी 5'10"), सडपातळ बांधा (मी एकदम fit पण थोडासा पोट सुटलेला ), चेहऱ्यावर हसू (मी बाल हनुमान ) ,रंग गोरा (मी पण जन्मता गोरा पण उन्हात cricket खेळून जर करप्लो होतो )..थोडक्यात मला suit होणारी मुलगी मला सापडली होती ...मी लग्नाच्या वयात आल्यामुळे माझात आपोआपच confidence आला होता ..मी उत्साहाने वरती पहिला तर तो फुलांचा गुच्छ ज्यातली एक माझी निशिगंध आणि बाकीच्या तिच्या हिरव्या पाला पाचोळ्या होत्या त्या गायब झाल्या होत्या ....माझी नजर सैरभैर फिरत होती ...
सापडली!!...तो गुच्छ गणपतीच्या दर्शनासाठी पायर्या चढत होता ..माझे मित्रा अजूनही आले नसल्याने मी त्यांच्या मागे ेलो ..मागे फुलले रे क्षण
माझे गाणं सुरु झाला होता ..
मी गणपती ला flying नमस्का केला पटकन त्याला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली ...हा गणपती मला फारच आवडला होता ..त्याच्या देवार्याला खिडक्या होत्या ..मी माझा speed असा match केला होता कि समोरून दर्शन घेताना
ती समोरच्या खिडकीत दिसत होती ..मी डावीकडे गेलो तेव्हा पण माझा स मोरच्या चौकटीत दिसली ..आज मी उजव्या सोंडेचा गणपती डावीकडून पहिला ...असा करात तिच्या मागे येऊन थांबलो गणपती ला front view मध्ये आम्ही एकत्र दिसू अशा pose ध्ये थांबलो ..न मनोमन हि प्रार्थना केली कि पुढच्या वेळी जोडीने येउदेत म्हणून ...

ती आता खाली उतरायला लागली होती ..मी नेमके sport shoes घातल्यामुळे माझी कसरत झाली ..बुटांची lace सोड्याची सवय इथे नडली ..कसे बसे ते पायात अडकवून मी खाली पळत आलो ...त्यांच्यामागे पळत जात असतानाच मित्राची हाक ऐकू आली .."कुठे पळतोस रे ???" आता काय उत्तर द्यावा ह्या विचारात मी "शाळेतला मित्र दिसलाय ! त्याला भेटून येतो "अशी थाप मारली ..मुळात १२ वर्षांनंतर मी शाळेतल्या एकही मुलाला ओळखू कलो नसतो ...पण अशावेळी शाळेतला मित्र हा उत्तम उपाय आहे हे लक्षात आला ..त्यातून मी अत्यंत मट्ठ बोरिंग होतो शाळेत त्यामुळे मला पण ओळखेल असा कोणी नव्हता ..

मी त्यांच्या मागे गेलो खरा पण ती काही दिसेनाशी झाली ...थोडा हिरमुसून परत मित्रांपाशी आलो .." भेटला का रे मित्र ?"..
मी : " नाही रे ..तसा वाटला मला .."असो अरे नवीन SLR वाटता ! दिवाळी खरेदी का ?" मी त्याच्या नवीन camera कडे बघत म्हणालो ..
" हो अरे ..म्हनला आज जरा मनोहर दृश्य बघायला मिळतात ..म्हनला फोटो काढावेत "
"अरे माकडा थोडा आधी आलास तर काही बिघडला असतास का ??"(मी मनातल्या मनात )

असा म्हणे पर्यंत पुन्हा ती दिसली ..माझ्या मित्राच्या मागे ..मला काय करावा सुचेना ..मी पटकन मित्राला त्याचा कॅमेरा मागितला ..आणि त्याला pose द्यायला सांगितली ..त्याला FB वर profile pic चा आमिष दाखवून माझ्या निशिगांधला आणि माझा ओबड -धोबड विखुरलेल्या मित्राला एका frame मध्ये capture करायचा ठरवला ..निदान photo तरी मिळेल ह्या आशेवर मी photo click केला ..पण तिचा
नेमका अर्धा चेहरा आला ..डोळे आणि तरतरीत नाक ...परत काढायचा म्हणलं तर तो ओंडका माझा कडे धावत येऊन आपला FB चा फोटो पाहायला लागला होता ..त्यामुळे 2nd click शक्य नव्हता ..internet वर एखादा software असेल कि फोटो फीड करून नाव कळेल ह्या आशेवर मी कॅमेरा मित्राला दिला ..

सकाळचे 8.30 झाले होते आणि मित्रांनी निघायची तयारी सुरु केली ..तो गुच्छ पण आता निघणार होता ..मी त्यांच्या मागे जायचा ठरवला ..पण मित्रांनी ज्या गोष्टीचा आमि मला दाखवला होता त्याची आठवण करून दिली --"बेडेकरांची मिसळ !!" 8 ला सुरु होता ..पण मी त्यांना म्हणलं कि तुम्ही पुढे व्हा number लावा मी येतोच ...

मी माझा निशिगंधाच्या मागे जाऊ लागलो ...ती गाडीवरून सहकारनगरला जाऊ लागली ..ह्या area मध्ये चांगल्या मुली राहत असतील अशी माझी समजूत झाली .मी स्वतावर खुश होऊन आरशात पाहून केसांमधून hero सारखा हाथ फिरवू लागलो .पण ती अचानक कुठल्या तरी गल्ली मध्ये वळली आणि मी तिला शोधात राहिलो ..अर्धा तास फिरत होतो पण काहीच काळात नव्हता ..तेवढ्यात phone वाजला ..." मिसळ संपत आलीये !!" एवढा एकच वाक्य बोलला ेला मी गाडी वळवली ...

त्या दिवसानंतर मी बरेच दिवस coffee प्यायला relaxe मध्ये येऊ लागलो ..कोथरूड ला राहत असून देखील दुर्गा च्या ऐवजी मी relaxe मध्ये आलो ...

हे सगळा डोळ्यापुढून जात होता तेवढ्यात mic चा कर्कश्या आवाजाने भानावर आलो ...डोळे उघल्डे तर उजाडायला लागला होता ...माझी नजर पुन्हा सैर भैर फिरू लागली .ती दिसतीये का शोधू लागलो ...
वर्ष गेला होता ...बराच काही घडला ह्या वर्षात ...दिवाळी नंतर ५ महिने US ला onsite जाऊन आलो ..आल्यावर तिला शोध्य्नासाठी परत त्या relaxe मध्ये जात होतो ..एकदा मित्रासोबत कॉफ्फी पीत असताना एका लांबच्या काकाने मला पहिला ...आणि त्याच्या भाची करता माझा स्थळ सुचवला ...आई -बाबांना ती आणि तिला मी आवडलो. असा दुघ्धाशार्कारयो जुळून आल्यामुळे माझा लग्न उरकून टाकण्यात आला ..

" चला देवळात जाऊयात ?" बायकोच्या ह्या प्रश्नाने मी पुन्हा भानावर आलो आणि मान हलवून उत्तर दिला ..
माझी नजर अजूनही तिला शोधात होती ...गणपतीने माझी मनोकामना गर्दी मुळे नीट ऐकली नसावी ..त्याने जोडीने मला बोलावून घेतला पण जोडीदार वेगळी होती ...असो हरकत नाही ... मी खाली येताना परत तिला शोधात होतो ..कुठे दिसतीये का माझी रजनीगंधा ...

" कोणाला शोधताय ? मी मगासपासून बघतीये तुम्ही काहीतरी शोधायचा प्रयत्न करताय ? कोणी येणार होता का ? "

" होय ...शाळेतला मित्र !!!" मी एवढा बोलून खिशातून माझा mobile काढून त्यात पाहू लागलो ....

afterall men will be men!!!

Thursday, October 20, 2011

“मैं कौन हुं ?”


" मैं कौन हुं ? मैं कहा हुं ? " हे एका typical स्मृती भ्रंश झालेल्या माणसाचा डोळे उघडल्या नंतरचा वाक्य असता ..मला कायम आशचर्य वाटता कि जर एखादा माणूस पूर्ण पणे सगळा विसरला असेल तर मग त्यालाआपलीभाषा तरी कशी लक्षात राहते..असो लेखक-दिग्दर्शक का चा स्वातंत्र्य ह्या नावाखाली आपण ते पचवतो देखील..असो तर मुद्दा हा आहे कि माणसाला केवळ सगळा विसार्ल्यानंतरच " मी कोण आहे ? " हा प्रश्न का पडतो ? त्याधी आपण कधीच हा विचार का करत नाही कि आपण कोण आहोत आणि आपण का इथे आलो आहोत ?(काही अपवाद आहेत "मद्यपान "!!!)
प्रत्येक बाळ जेव्हा जन्मायला येत तेव्हा ते रडत असता ..(मी रडलो नव्हतो !!!देवाशप्पथ!)
माझा मते त्या मागचा कारण त्याला देखील हाच प्रश्न पडलेला असतो " मी कोण आहे? मी का इथे आलोय ?" केवळ त्याला कुठली भाषा माहित नसते किंवा त्याला इतर कुठल्या प्रकारे त्या भावना व्यक्त करता येत नसतील म्हणून रडणे हा सोयीचा मार्ग असावा..
तो पूर्ण पणे LOST असतो..मुळात तो त्याचा मर्जी शिवाय ह्या जगात आलेला असो..त्यामागचा कारण काही असो पण त्याचा जगात येण्यामागचा प्रयोजन त्याला माहित नसता ..त्याच्या पुढे त्याच्या अस्तित्वाचाएक प्रश्न उभा राहतो ! ...ह्या सगळ्या गोष्टीनमध्ये त्याचा प्रश्न हा अनुत्तरीत राहतो किंवा काही वेळासाठी दुर्लक्ष केला जातो..

आता मला हा प्रश्न का पडला आणि ह्या वर लिहावासा का वाटला ? हे म्हणजे साजिद खान किंवाdavid dhawan ने Black , गुजारीश सिनेमांचा sequel , remake बनव्ण्यासारखा आहे पण तरीही विचार येतो डोक्यात आणि ते लिहिलाही जाता..
rockstar ह्या सिनेमाचा " कून फाया कून " हे सुफी गाणं ऐकत होतो..
रहमान चा संगीत..पेटी,गिटार,तो दर्ग्यात्ला माहोल ह्याने ते गाणं आधी आवडला खरा पण नीटऐकल्यावरत्यातला "कर दे मुझे ,मुझसे दीदार मेरा !" ह्या ओळीने अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आला..का ते माहित नाही..

Kun (كن) is an Arabic word referring to the act of बेइंग . Faayakun means and it is !
" Be ..and it is !!! "
रहमान चाच " ख्वाजा मेरे ख्वाजा " ऐकताना आवडला होता पण पाहिल्यावर हसू आला होता.. गाण्याचा शेवटी ह्रितिक सारखा अप्रतिम dancer खांद्यावर कळशी आणि हातात बादली घेऊन असा का गोल फिरतोय कळत नव्हता..इतकाच काय तर बालगंधर्वा सारख्या मराठ मोळ्या सिनेमात देखील जेव्हा ते एकटे असतात तेव्हा सुफी गाण्याचा आधार घेण्यात आला होता...observe केल्यावर लक्षात आला कि सुफी आणि self - realisation ह्या २ common गोष्टी आहेत..गेल्या आठवड्यात timesमध्ये सुफिस्म वर लेख होता त्यात त्यांनी "संगीत" ह्या माध्यमातून देवा ला शोधणे हा मार्ग निवडला होता...(Sufism: Relating to God with deep passion by Sajjad Shahid )
इथे मला सुफिस्म ह्या विषयावर बोलायचा नसून..त्यांनी ज्या प्रकारे स्वताला ओळखण्याचा मार्ग शोधलात्याचा उदाहरण द्यायचा होता.. हि गाणी हे एक निमित्त झाला पण महत्वाचा काय आहे -- स्वतालाओळखा !!!
पण देवाला शोधणे म्हणजे आधी स्वताला ओळखणे हे सत्य ...
आता थोडा practical किंवा technical विचार करायचा म्हणलं तर MBA मध्ये Maslow's hierarchy of needs ची गाठ पडली..


त्याच्या theory नुसार कि माणसाचा अंतिम गरज हि self-actualization आहे ..पण त्यासाठी त्याला आधीच्या ४ गरजा पूर्ण झाल्याशिवाय मिळवता येत नाही..
“What a man can be, he must be.” This forms the basis of the perceived need for self-actualization ! This level of need pertains to what a person's full potential is and realizingthatpotential .
ते बाळ डोळे उघडून आजूबाजूला बघतो तर सगळे लोक त्याच्या कडे कौतुकाने पाहत असतात..कालांतराने त्याला नाव दिला जाता ..जात-धर्म-संस्कार ह्या सगळ्या गोष्टींशी आपला बाळू
जोडला जाऊ लागतो , मग पुढे शाळा - शिक्षण ह्या राम रगाड्यात तो पूर्णपणे system चा एक भाग बनून जातो..पुढे त्याचा mindset असा काही बदलला जातो कि तो पैसे,लग्न ह्या गोष्टींकडे ओढला जातो..बाळाराम वयाच्या तिशीत न चाळीशीत मुलांचे शिक्षण , आणि आपला समाजातला स्थान ह्याकडे पूर्ण वेळ जातो..पन्नाशी हि retirement ची स्वप्ना बघण्यात जातात..
बाळासाहेब आता ६० वर्षांचे झालेत ..सगळ्या जबाबदाऱ्या , कर्तव्य ,चैन ,मौज करून झाल्यानंतर पुढे काय हा प्रश्न पडतो न मग system प्रमाणे तो अध्यात्म कडे वळतो..न मग नित्य नियमाने भजन,कीर्तन,देवळात जाने,तीर्थक्षेत्र असले उद्योग सुरु करतो..न डोळे मिटतो..
मुद्दा हा आहे कि आपण आपला ८० % आयुष्य ह्या गरजा आणि बाह्य गोष्टींकडे लक्ष्य देण्यात घालवतो..पण केवळ १०-२० % आयुष्य आपण नक्की कोण आहोत ह्याचा विचार(???) करण्यासाठी घालवतो ..हे सुधा किती लोक करतात हा चर्चेचा मुद्दा आहे...

थोडक्यात काय तर आपण पूर्ण आयुष्य जागून झाल्यावर कसा जगलो ह्याचा विचार करतो आणि जर काही चूक, गिल्ट मनात असेल तर अध्यात्म कडे वळून त्याचा प्रयास्चीत करायचा बघतो..पण आपण जगलोच का हा विचार कधीच करत नाही..आपल्या हातातली कामा टाकून हा विचार करू नका असा मीम्हणत नाही ( मी करतोय कारण माझा हातात काम नाहीये , bench ह्या बिन कामाच्या नोकरी वर बसून ते हि पगार घेऊन ...
आणि मी जन्मल्यावर रडलो हि नसल्याने मला तशी विचार करायची गरजही नाहीये )
बर्याच लोकांना हा विचार करायची गरज हि वाटणार नाही..हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...
पण निदान तुम्ही जाताना " मैं कौन था ? मैं यहा क्यू था ?" असा म्हणून जाऊ नका हीच इच्छा !!!!

Tuesday, October 4, 2011

सिनेमे जलन ....


Bf : सिनेमा पाहायला जाउयात ?

gf : हो जाऊ ना !

Bf : कुठला ? एखादा छान romantic ? तुला आवडतात ना तसे ..

Gf : वेडा-बिडा झालायेस का? आवडायचे !!! आता नाही...

bf : मग आता ?

GF : ढिशुम ढिशुम वाले ...सलमान,अजय,जॉन,...moustache men !!!!

bf : OK (मिसुर्डा हि ना फुटलेला चेहऱ्यावरून रुमाल फिरवत ...)

तर मित्र हो हि वेळ आलेली आहे.. मुलांनी माधुरी,राणी,ऐश्वर्या ह्यांना पाहण्यासाठी (खरा कारण वेगळा आहे ) सिनेमाला जायचे दिवस आता गेले..आता

Action films are back !!! Moustache men are roaring !

bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster !!!

सध्या जो बघेल तो ढिशुम-ढिशुम चे सिनेमे काढतोय..न ते चांगला धंदा पण करतायेत..जॉ अब्राहम चा 'फोर्से' नामक सिनेमा सध्या गाजतोय..थोडक्यात मारामारीयुक्त ची चांदी होतीये...इतकाच काय तर आपला 'romance king ' SRK पण पुढचे २ सिनेमे मारामारीचेच घेऊन येतोय ...

तर मुद्दा हा आहे कि मला सिनेमांची खूप आवड आहे..typical हिंदी सिनेमे..आणि अगदी लहान पणापासून मी theatre मध्ये जाऊन सिनेमे पाहिलेत

( आभार : आई-बाबा, ना वि वि )....म्हणजे मला कळायला लागल्यापासून मी सिनेमे पहिल्याचा मला आठवतंय..

मुळातच फालतू विषयांवर चर्चा करणे आणि फुकट वेळ घालवणे हे आवडते काम असल्यामुळे हे सिनेमे इतके का पैसे कमवू लागले न त्याही पेक्षा लोकांना का आवडू लागलेत ह्याचा विचार खूप डोक्यात घोळू लागला..

तर ह्या गोष्टीची सुरुवात होते १९३० पासून ...जेव्हा बरेच चे सिनेमे हे संत पट होते, किंवा स्वातंत्र्याशी निगडीत होते ( directly or indirectly )..

त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला न सगळा छान छान वाटू लागला...१५० वर्ष बोर्डिंग स्कूल मध्ये राहिल्यावर सकाळी आपल्या घरी आपल्या बेड वर झोपेतून उठल्यावर जसा वाटता ना तसा..ह्याचे प्रतिबिंब सिनेमान मध्ये सुधा दिसले.. आता आपल्याला स्वातंत्र्य मिळाला ..सगळा कसा छान छान होणारे..फील गुड होता सगळीकडे..सिनेमे सुधा तोच फील continue करू लागले..लोकांना स्वप्ना दाखवणारे सिनेमे सुरु झाले..देव आनंद,दिलीप कुमार,शम्मी कपूर,राजेंद्र कुमार असे सगळे मिशी नसलेले हिरो लोकांना आवडू लागले..प्रेम कहाण्या,काश्मीर चे locations , college मध्ये नेहमी पहिला येणारा हिरो,मा का लाडला बेटा, बेहेन का प्यारा भैय्या ,नोकरी करणारा..काही अपवाद होते त्यातला एक मिशीवाला म्हणजे राज कपूर आणि दुसरा म्हणजे गुरु दत्त ..ह्या दोघांनी जरा वास्तविक सिनेमे केले..समाज,ग्रामीण समस्यांशी निगडीत गोष्टी सांगितल्या..हे साधारण १९६० च्या दशकात घडत होता..हरित क्रांती सारखे उपक्रम घडल्यामुळे भूक बळींची संख्या कमी झाली.."सुजलाम सुफलाम " ह्या घोषणा ऐकू येऊ लागल्या.. हा तेव्हा काही मारामारी सिनेमे पण निघाले पण ते भारत- चीन युद्ध ह्या वर आधारित होते..त्या व्यतिरिक्त मारा मारी म्हणजे तोंडाने "ढिशुम ढिशुम " असा आवाज काढून प्राण,प्रेम नाथ,प्रेम चोप्रा ह्यांना मारण्या पुरताच मर्यादित होती..त्यातूनच राजेश खांना नामक अजून एक बिगर मिशी वाला तरुण लोकांपुढे उभा राहिला आणि बाकी सगळ्यांना आडवा पडला..पोरी त्याच्या मागे फिदा होत्या.."superstar " हि ख्याती मिळवणारा हा पहिले हिरो..


१९७० ची सुरवात होती.. स्वातंत्र्य मिळून २५ वर्ष झाली होती.. पण नेहरू-शास्त्रींनी बघितलेली स्वप्ना पूर्ण होताना दिसत नव्हती..अन्नाचा उत्पादन वाढला होता पण रेशन मध्ये भ्रष्टाचार पण वाढला होता..

इंदिरा गांधी सत्तेवर आली आणि socialist mindset ने सरकार चालवू लागली.. तरुण लोकांना स्वप्ना दाखवली गेली होती.पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांना ज्या संध्या मिळायला हव्या होत्या त्या मिळत नव्हत्या...सगळा छान होणार हे केवळ एक मृगजळ वाटू लागला होता.. एक आग आत मध्ये धुस्मात होती.. एक घुसमट होती,मनात एक चीड होती,license raj मुले तरुण उद्योजक हैराण झाले होते... JRD TATA पण ह्याला अपवाद नव्हते.. त्यांच्या 'महाराजा' ला देखील शरण यावा लागला होता..(आज त्याची काय अवस्था झालीये हे आपण पाहू शकतो )....


तो बुळबुळीत पण,खोटा गोड गोड वागणं,ह्यातून एक frustration बाहेर पडणार होता न ते पडला देखील..ते सिनेमातही दिसला..अमिताभ ची अंग्री युंग मन image , गुलझार चा मेरे अपने, सलीम-जावेद चा दिवार,शोले ,त्रिशूल,काला पथर ,शत्रुघन सिंह चा "खामोश" हा त्या भावना व्यक्त करत होता... कॉलेज मध्ये पहिले येणारे हिरो आता रस्त्यावरचे बूट पोलिश करणारे झाले..लहानपाणी एका पोळीचा तुकडा चोरताना पाळणारा मुलगा धावता धावता एक दागिना लुटून पाळणारा हिरो झाला.. पोलीस मागेच असतात..त्यातूनच emergency सारखे कलंक आपल्यावर फासले गेले..हीच स्तिथी १९८० मध्ये पण होती..सिनेमा अजून थोडा वास्तववादी झाला..ओम पुरी चा अर्ध सत्य असो किंवा नाना पाटेकरचा अंकुर..सनी देओल चा अर्जुन,घायल असो..चीड मनात होतीच...आणि ती पडद्यावर दिसत होती..लोकांना ते आपलासा वाटत होता....

१९८० चा शेवट आणि भारत कर्ज बाजारी झाला..पण त्या अंधारा मधेच एक आशेचा किरण दिसला..यशवंत सिंह ने आपली आर्थिक धोरण बदल्याचे पाऊल टाकले आणि ते नव्या पिढीला खूप उर्जा देऊन गेले..त्याच सुमारास अनिल कपूर ,जाकी श्रॉफ ह्या मिशी वाल्यांच्या मध्ये आमीर आणि सलमान हे बिगर मिशी वाले हिरो 'कयामत से कयामत तक' आणि " मैने प्यार किया " असे प्रेम कहाण्या घेऊन आले...आपला रोमान्तिक शाहरुख सुधा TV वर हात पाय मारतच होता...


आणि अखेर तो दिवस उजाडला..२० जून १९९१ भारताचा दुसरा स्वन्तान्त्र्या दिवस..मनमोहन ,मोन्टेक आणि चिदंबरम ने नवीन आर्थिक धोरण स्वीकारला..LPG (liberalisation ,privatisation ,globalisation ) ने भारताचा बाजार दुसर्या देशांसाठी खुला केला..

गुंतवणूक वाढली, उद्योजकांना प्रोत्साहन दिला.. पुन्हा सगळा छान छान होणार असा वाटू लागला..

IT ची झेप डोळे दिपवणारी होती...मध्यम वर्गीय माणूस आता mall , विमान, परदेश वारी ची स्वप्ना पूर्ण करू लागला...इकडे सिनेमान मध्ये आमीर,सलमान आणि शाहरुख पुन्हा स्वप्ना दाखवू लागले..

काश्मीर ची जागा आता switzerland नि घेतली..फुल blouse ची जागा आता स्लीवेलेस ने घेतली..विमानातून उतरणारा राहुल..पोरींना वेडा करू लागला..शांत प्रेम मुलींच्या प्रेमाच्या अपेक्षा वाढवू लागला... आता फरक फक्त एवढाच होता कि हिरो हा कॉलेज मध्ये उशिरा येणारा , नापास होणारा,पार्ट्य करणारा पण देवळात जाणारा,घरच्यांचा मान राखणारा असा portray होऊ लागला त्यामुळे सर्व सामान्य मुला देखील वेडी झाली....

१९९० चा दशक ह्याचा पुरावा होता.. DDLJ , HMHK ,KKHH ,DTPH असे सिनेमे तरुणाई ला त्या प्रवाहात ओढू लागले..

परत सगळा छान छान होणार असा वाटत असताना भ्रष्टाचार, बोंब स्फोट,दंगली,terrorist attack ..सुरु झाले..शिक्षण संस्था खूप सुरु झाल्या पण वशिले बाजी पण तितकीच बळावली..पैसे दिले कि काम होतात, पास होऊ,degree मिळेल ह्या सगळ्या मुले मध्यम वर्गीय सुशिक्षित तरुण हा बेरोजगार राहू लागला... हळू हळू frustration वाढू लागला..पुन्हा तीच चीड सुरु झाली....

मुंबई सारख्या शहरावर अनेक वेळा रेप केले गेले तरी मुंबई स्पिरीट च्या नवा खाली सगळ्या भावना मारल्या गेल्या..दुसर्या दिवशी नोकरीला ला गेलो नाही तर रात्री जेवायला मिळणार नाही ह्या भीतीने माणूस कामावर जाऊन लागला..कसला आलाय मुंबई स्पिरीट....

IT नि घेतलेली झेप २००२ मध्ये फटाका चा रोकेट कसा परत खाली येत ना तसा खाली आला..अनेक लोक पुन्हा बेरोजगार झाले..२००८ च्या मंदी ने तर कळस गाठला .. आपल्या कुवती पेक्षा जास्त कर्ज घेऊन स्वताचीच मारून ठेवली..आधी फक्त नोकरी नव्हती आता तर गहर हि जायची वेळ आली होती..परदेशात जाऊन शिकायची craze अंगावर आली..

परत सगळी चीड वाढली...मग प्रेम कहाण्या करणारे आमीर,शाहरुख आणि सलमान मिशी वाढवू लागले...त्याला साथ दिली अजय,अक्षय,जॉन ह्यांनी..

स्वप्ना चिरडली जाऊ लागली ...सगळी घुसमट पुन्हा बाहेर पडू लागली...सिनेमान मध्ये आग दिसू लागली...सिनेमाने ते ओळखला आणि त्यात पैसा कमवू लागले...त्याचा उत्तम उदाहरण म्हणजे bodyguard - superhit !, wanted - superhit , Dabangg - Blockbuster , सिंघम- Superhit ,Ghazni - blockbuster ..

सलमान झाला,आमीर झाला,अजय झाला ...आता लोक वाट बघतायेत शाहरुख ची ...

आणि मी वाट पाहतोय तिसर्या स्वातंत्र्याची आणि माझी मिशी वाढण्याची !!!

आशय

Wednesday, January 5, 2011

फेस'भूक' !!!

मला सांगा रामायण , महाभारत , आणि फेसबुक यात साम्य काय? तिन्ही घटना एका बाई मुळे घडल्या !!! पुराणात रामायण सितेमुळे घडला असा म्हणतात पण माझा मते ते घडला ते त्या मंथरे मुळे .तिने कैकयी चे कान फुंकले आणि ह्या बाईनी नवर्याकडून २ वर (नवर्याला वर का म्हणतात हे आता कळले !!)मागायची इच्छा पुर्ण केली.. सीता फार नंतर आली...महाभारताचा म्हणाल तर ते घडला एका आदिवासी बाई मुळे..एक राजा होता तो शिकारी ला जंगलात गेला ..तिकडे त्याला खूप ताप आला म्हणून एका आदिवासी बाई ने त्याला आसरा दिला ..ह्या गड्या ला रात्री थंडी वाजायला लागली न घडायला नको ते घडला..त्या बाई च्या नादी लागला आणि हिचे वंशज म्हणजे कौरव आणि त्याची राणी चे वंशज म्हणजे पांडव ...आता राहिलं प्रश्न फेसबुक चा तर सगळ्यांनाच माहिती आहे..एका मुलीने डिच केल्यावर तिच्यावर खुन्नस काढायला सुरु केलेला उपद्यावाप म्हणजे फेसबुक !!!(इथे सामान्य द्यान संपला ) असो तर मुद्दा हा आहे कि जगात कुठली हि भयानक गोष्ट घडली तर त्याचा कारण असता 'बाई '...(मी बाई वर ब्लोग लिहिणार नाहीये ..त्या भयानक गोष्टी वर लिहिणारे...)
फेसबुक भयानक आहे आणि ते रामायण ,महाभारत सारखाच पृथ्वी वर मोठा उद्रेक करणार हे नक्की...त्या युद्धान मध्ये लोक घर बाहेर जाऊन लढले..इथे प्रकार उलटाच आहे..प्रत्येक जण आपापल्या घरी बसून,बोलावून लढतायेत..मार्केटिंग चे लोक आपला खप कसा जास्त होईल ? जास्तीत जास्त गिऱ्हाईक कसा मिळवता येईल ह्या साठी लढतायेत, तर तरुण लोक मुलींचे फोटो पाहून ह्यातली कुठली मुलगी आपल्याला सूट होईल ह्यासाठी लढतायेत....(मुली पण काही मागे नाहीयेत )..आई वडील आपल्या परदेशी गेलेल्या मुलांना बघण्यासाठी नवीन तंत्रद्यानाशी जुळवून घेताना लढतायेत ,तर छोटी मुला आपल्याला काहीतरी कळेल ह्यासाठी लढतायेत...
थोडक्यात काय तर हे फेसबुक नसून फेस'भूक' होत चाललाय...कलयुगात ली हाव म्हणजे काय तर ह्याचा उत्तम उदाहरण आहे हे..काम,क्रोध,लोभ,मोह, माया,मत्सर,द्वेष,वासना ह्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायचा असेल तर ती जागा आहे फेसबुक...कोणीतरी कोणाच्या हनिमून चे फोटो अपलोड करतात आणि बाकीचे हावरे लोक असल्या फोटोंना अंगठा दाखवून लाईक करत आपली लायकी दाखवतात.त्यावरती ३०-४० comments..
ते ओर्कुट जरा बारा होता..लोकांनी एकमेकांना पाठवलेले स्क्राप त्यांच्यापार्यांतच मर्यादित राहायचे..इथे म्हणजे सगळ्याच गोष्टी चव्हाट्यावरच आणलेल्या आहेत...
social networking च्या नाव खाली personal असा life काही उरलेलाच नाहीये...आपण कायम लोकांच्या नजरेत, चर्चेत नसलो तर आपला काही खरा नाही अशा मनस्थितीत लोक updates टाकत असतात...आता उठलो...आता अंघोळ केली..आता जेवलो..आता मित्रांना भेटलो..हे सगळा त्या sites वर ...कोणीतरी कोणाच्या जवळ असलेला फोटो असला कि लगेच 'i m jealous ' अशी comment आलीच म्हणून समजा..आपला relation complicated आहे हेच का आपण शिकलो आपल्या घरांमधून ?...
New year ल सुधा आई वडिलांना,देवाला नमस्कार करून शुभेच्छा देण्याआधी आपले updates ह्या sites वर...
मी,माझा ,मला च्या ऐवजी तूझ ,तुमचा,सगळ्यांना असा एकुणात प्रवाह वाहताना दिसतोय....
शाळेत असताना कोण कोणास म्हणाले असा एक ५-६ मार्कला प्रश्न असायचा..सध्या तोच प्रश्न जसाच्या तसा इथे वापरता येईल..सगळ्यांना सगळा दिसत...
ब्लोग च्या उद्दषेया एवढाच आहे कि आधी जरा personal life वर लक्ष केंद्रित करा मग सोशल साईट्स वर सोसल एवढंच आहारी जा ..आमच्याच एका नाटकात एक वाक्य होता." आधी स्वताचा झाका न मग दुसर्यांचा बघायला वाका !!!"
सध्यातरी तरी हि भूक वाढतच जाणारे असा एकुणात दिसतंय..त्यामुळे मी देखील जास्त लिहिण्यात अर्थ नाही...पण लिहिलेला ब्लोग जास्तीत जास्त लोकां पर्यंत पोचावा म्हणून ह्याची लिंक अर्थातच फेसबुक वर टाकतोय..कृपया like करा...आणि comments लिहा...
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

आशय

Sunday, January 2, 2011

Regret Movie no 1: Finding Nemo!!!


Steve Job’s Pixar has a very high reputation in animation films like his apple products.And when it combine with Walt Disney Pictures it creates wonders.The content itself is very strong and with excellent finishing it definitely wins accolades from the audience. .According to Pu la Deshpande ,a renowned Marathi Author “ Only 2 people should be given the Nobel Prize for Peace, Charlie Chaplin and Walt Disney!! The amount of relaxation and enjoyment given by these 2 people and their contribution is enormous.

Finding Nemo is such kind of film. With all possible creative imagination the animators have created ‘The great barrier’ reef located near Australia,about which we have studied in our school .The reef which is famous for its coral life.It has very rare and different kind of species surviving in it.

A story revolving around a father and son.A clown fish whose wife and hundreds of eggs are d

estroyed by a Shark ,only one egg survives and as per wife’s wish he names him as ‘Nemo’. Nemo has one small fin

which makes him a bit handicapped as he can’t swim as other fishes. This makes his father more conservative about his son.too much care and restrictions frustrates Nemo. Yes,I relate with this in my life. In our teenage life we don’t like restrictions on us. We want to explore things on our own, revolting attitude.

Nemo revolts against his father and hates him for his over caring nature and falls into trap by divers and is taken to Sydney.

The movie revolves around Nemo’s father’s journey to find him.

With such a simple story the creators of characters have shown a very deep thought while writing the script and characters.May it be the Dory who constantly forgets things due to short term memory loss(in short ‘lady ghazini’ but remembers the address where Nemo has been taken, or it may be the

turtles who show the direction to Nemo’s father,the Sharks who shows co-operation by saying ‘Fish

are not food they are friends’ but when they smell the blood they are uncontrollable.Its same like maki

ng a resolution onot eating junk and oily food but unable to resist such food when seen smelt. Pixar movies or for that matter any animation movie revolves around family Characters desparate to have a family, missing family , making dreams come true are the protagonists. Finding Nemo also deals with such kind of thought, parents should let their children free at right age.Too much compulsion and restriction increase more urge in them to try that stuff Parents prevent their children by telling them that it’s a bad thing,but they don’t understand that they should also tell the kids the reason ,why it is bad. Incomplete compulsions increases the probability of kids to try those things. Its like an rubber or elastic , the more you pull back the more they will go away. Another thought which creates an impact is if you are in search for something people on the way directly or indirectly help you. Yes there are bad times but it is temporary. Perseverance is a quality which everyone should have. In this rat race we tend to jump quickly or leave the efforts by not doing it patiently as we want results ASAP.We live in the world where pizza comes early than an ambulance, perseverance is a must. This reminds me of one very nice quote” People behave in the same way with you in your downfall the way in which you had behaved with them during your good times!!!”Even if you are in a hurry or switching very fast be attached to the people because they are the biggest assets of anyone’s life. When you look back there should be someone who will wave at you with a smiling face(genuinely).

Coming to creative aspect of the film,vibrant use of colours with background of blue sea makes the visuals effective.Different kind of species are handled very well for eg there is one species of fish which travels in group, they have been used to show various shapes.Minute detailing and observations deserves a Thumbs Up!!

And last but not the least ,maintain your Humour,Smiles because at the end of the day its mental relaxation which matters and not Stock Market.

To sum up if you haven’t watched this film,please download(high quality) and spare 90 min to experience the Sea world.

Tuesday, August 10, 2010

DEV 'D'

Dev 'D'
" समाजात मनुश्याला इत्क्या वाईट परिस्तिथीन्ना सामोरा जाव लागता की त्याच आयुश्यच बद्लुन जाता." खरतर blog ची सुरुवात कशी करावी ह्या वर खूप विचार केला.पण "आयुश्य ,ह्या जगात ,आज काल समाजात .." असे funde मारले की blog ला थोड वजन येत अस मला वाट्तय.निदान मी वाचतो तेव्हा तरी असा अनुभव येतोच..असो ,रात्रीचा १ वाजलाय ,बाहेर मस्त पाऊस पड्तोय न मी blog लिहितोय.(हा अजिबात रोमानटिक blog नाहिये).. २ महिन्य़ान पूर्वी मी चेन्नईला माझ्य़ा internship करता गेलो होतो.(हा blog म्हण्जे तिथला प्रवास वर्णन असेल अस वाट्त असेल तर तो सुधा नाहिये)..
"अरे माकडा मग हा blog अहे तरी कशावर?"(तुमच्या मनात येणारा प्रश्न) .

असो तर साधारण ३-४ महिन्य़ान पूर्वी मी चेन्नईला जाणार हे माहित होत.त्यामुळे तिथे रहायची सोय ,work profile ह्याबद्दल बरच विचार आणि हाल चाल सुरु होती."तिथल वातावरण खुप खराब आहे" , " अरे रोज इड्ली खावी लागेल","तमीळ सिनेमे अन गाणी ऐकावि लागतील" "office मधले सगळे मद्रासी लोक असतील!" अशी वेगवेगळ्या लोकान कडुन सारखीच वाक्य ऐकयला मिळाली.बरीच फ़ोन-फ़ोनी केल्या नन्तर एक flat मिळाला.त्यातुन रूममेट हा महाराश्ट्रीयन हे समजल्यावर तोच flat finalise केला.२२ तास आणि रिक्शा वाल्याशी (यशस्वी रित्या) हुज्जत घालुन रूम वर पोचलो.’तो’ सामान घ्यायला खाली आला होता.(ह्या ’तो’च आणि पु.ल.च्या ’तो’ च काडिमात्र सम्बन्ध नाहिये) उन्ची सधारण ५ फ़ुट ३ इन्च..एक loose tshirt आणि loose bermuda.ती नावाला bermuda होती,त्याच्य उन्ची मुळे त्याला ति 3/4th सारखी दिसत होती.मला माझ्या लहानपणाची आट्ठ्वण आली,सन्घाच्या शाखेत जायचो..तिथे घालावी लागणारी चड्डी अशीच होती..’नमस्ते सदा वत्सले मात्रुभुमि..’ सोबत ’चला जाऊ सन्घात ,एक चड्डी दोघात’ हे म्हणायला शिकलो...पण ’तो’ च्या चेहरयाकडे बघुन ’तो’ कधी सन्घात गेला नसेल अस उगाच वाट्ल मला.."काय रे कसा झाला प्रवास?घर सापडायला काही problem तर नाही ना आला?",मी-" अरे प्रवास एकदम छान,हा रिक्शा वाल्याने थोडा त्रास दिला की luggage चे extra पैसे द्या पण मी logically त्याला explain केले की बाबा रे माझ्यासोबत rickshaw मधे अजुन काहि लोक असती तर तू extra पैसे घेतले असतेस का?" हे त्या rickshaw वाल्याला कितपत पट्ल मला माहित नाही पण "ஔஹ்ச்ஜ்ப்க்ஜச்த்பைல்கஜ்த்னஶ்ஹ்த்லஜ்ச்ல்" (वाकड तोन्ड करुन बोलला अन निघुन गेला)..
"अरे इथल्या लोकान्ची mentality खुप वाईट आहे" -’तो’ ने माझी एक bag उचलली .मला ह्या वाक्याचा प्रत्यय नुकताच आल होता.घर शोधताना ज्या building मधे मला जायच होता त्या building समोरुन किमान ३ वेळा गेलो.त्याच building खाली एक म्हातारा उभा होता.त्याल पत्ता विचारला तर त्याने चक्क माहित नाही म्हणला.आणि आता बघतो तर काय हा म्हातरा त्याच building च्या ground floor ला आपल्या galleryतुन बघत होता.कदाचित त्याला एक सुन्दर मुलगी असेल आणि आमच्यात काहितरी होइल ह्या चिन्तेने त्याने मला पत्ता नीट सान्गित्ला नसेल.मी लगेच त्याची मुलगी कशी असेल आणि २ महिन्यात आम्च्यात काय होइल ह्याच विचार करायला लागलो.
"अरे ते non-tamil लोकान्नाशी बोलतच नाहित,हरामखोर साले"- ’तो’ च्या वाक्याने मी भानावर आलो.मला त्याच म्हणन एकदम पट्ल."खवचट म्हतारा साला!!!"
" तु lucky आहेस,आजच रूम वर T.V आणि DTH connection लावलय".."वाह!! क्या बात है! म्हण्जे football worldcup बघता येणार."
चला म्हणजे रुम मेट मराठी , ground floorवर सुन्दर मुल्गी (असेल अशी अपेक्शा,इच्छा,प्रार्थना) आणि रुम वर TV असा ऐकल्यावरच छान वाट्ला..आता फ़क्त रुम मधे गेल्यावर छान अगरबत्तिच्या धुराने आणि घमघमाटाने स्वागत होणच बाकी होत.अस म्हणत रुम मधे शिरलो आणि खरच धुर होता पण cigarette चा. इनमीन १०*१० ची खोली एका कोप्र्यात सगळे कपडे ओसन्डुन वाहत होते. दारुच्या बाट्ल्या छान रचुन ठेवल्या होत्या.ashtray म्हणुन newspaper खोली भर पसरव्लेले होते.खिड्की मधे सगळे कपडेच कपडे होते.त्यामुळे अन्धार होता. त्यातुन खोलीच रन्ग हिरवा."तु येणार म्हणुन खॊली आवरली!!"-तो.
मला आता काय reaction द्यावी खरच कळत नव्ह्त.हे जर आवरण असेल तर आधीची परिस्तिथि काय असेल मला imagine करवेना.(मला माझ्या खोलीची आठवण आली :))
"आयुश,तु drinks घेतोस का रे?"(marathi graphiti आठवली-’हअ प्रश्न आहे कि आमन्त्रण’?),
"कधी कधीच ,काही occasion असेल तरच,आणि माझ नाव आशय आहे,आयुश नाही"-मी(मला ह्यच खुपदा अनुभव आलेला आहे न राग ही,"आक्श्य","असाय", पासुन "अशोक" पर्यन्त माझा उद्धार झालेला आहे)..
"अरे sorry,aso आज drinks घेणार?"-’तो’
"नाही रे,आज नको.."-मी
"मी घेतली तर चालेल? काही problem नाही ना तुला?"- ’तो’
(घरातल्या दारुच्या बाटल्या बघुन हे प्रकरण occasional नसुन रेगुलर आहे हे समजत होत मला,पण जो पर्यन्त आप्ल्याला त्या गोश्टीचा त्रास होत नाही तो पर्यन्त चालुदे म्हण्ल)
"छे रे..problem कसला त्यात,(फ़क्त पिऊन उल्ट्या न तमाशे करु नका),काय विशेष आज?"
" माझ्या परी च बारस आहे आज..(शान्त्पणे दारुचि बाट्ली उघडत ’तो’ म्हणाला)"
"परी?"
"माझी मुल्गी"
"अरे मग तु इथे चेन्नईत काय करतोयेस?ठाण्याला नाही गेलास?"
"झक मारतोय,सुट्टी नाही"-’तो’(शान्त्पणे)
"अरे मग bossला सान्गयच ना..२ दिवस द्या"
"मित्रा तुला अस वाटतय का की मी हे विचारल नसेल?"
"मग?"
"माझी इथे transfer झालिये एका महिन्यापुर्वी..किमान २ years तरि इथेच आहे.......असो तु सान्ग घरी कोण कोण असत तुझ्या?किती दिवसानसाठी आलायेस?"
"आई-बाबा, २ महिने..आणि एक महिन्यपुर्वी म्हण्जे ? तुझी मुल्गी होति किति दिवसान्चि?"
"११ दिवसान्ची"
"त्यानन्तर.."
"एकदा हि नाही बघितला.." माझ वाक्या पुर्ण व्हाय्च्या आत ’तो’ म्हण्ला.
पण मी बघत होतो तिला माझ्या येणारया २ महिन्यात...२ quarter आणि १ पाकिट cigrette च सम्प्वुन रात्रि १२ला त्याने घरी फ़ोन केला आणि त्या १.५ महिन्याच्या परी शि गप्पा मारल्या.त्याने तिच्यासाठी चेन्नई हुन चेन पाठवली होति.आवड्ली का विचारत होता...
तिच आ..उउउ..ऊऊऊ एवढच ऐकुन ’तो’ तिच्यशी सन्वाद साधत होता.
पुढ्चे २ महिने मी हा सन्वाद रोज ऐकला...
एवढ्च नाही तर बायकोशी होणारे वाद,"मी नीट आहे,तुम्ही तुम्ची काळजी घ्या.."अस वड्लान्शी खोट बोललेला,"खुप भूक लाग्लिये ग आई..तुझ्या कार्ल्याच्या भाजी ची खुप आठवण येतिये ग(कार्ल्याची भाजी खुप छान लागत असेल अशि मझी समज झाली)..तिकडुन fax कर ना भाजी.."उपाशी पोटी आई शी बोलण,कट्ट्यावरच्या मित्राला मी गणपती मधे घरी येतोय तेव्हा मिरवणुकित नाचु ह्याच अश्वासन..तुम्ही म्हणाल की हे तर बरयाच लोकान्च्या बाबतीत घड्त आम्ही स्वत: ऐक्लय...पण एका बापाला "plz..मला परीचा निदान फ़ोटो पाठव..पाया पड्तो मी तुझ्या..."अस रड्ताना पाहिलय?..हे सगळ झाल्यवर ’तो’ खाली जायचा..१ पाकिट cigrette,1 quarter घेऊन यायचा..."आशय,तुला त्रास नाही ना रे होत? मी प्यायलो तर चालेल ना?"..त्याच guilt मला दिसुन यायच..
"छे रे..problem कसला त्यात?" पण ह्यावेळी तुसडे पणा नव्ह्ता...
दुसरया दिवशी येताना एक उद्बत्तिचा पुडा घेउन आलो..रोज रात्रि त्याचा ठरलेला प्रश्न "आशय,प्यायलो तर चलेल न?"..
"हो..पण एक cigrette नन्तर एक उद्बत्ति लावायची..."हि एक अट घातली मी त्याला...त्याने ति पाळली देखिल..
सकाळी ८ला घर सोडायचॊ आणि रात्री ८ला घरी यायचो..मी juice पिउन आणि ’तो’ either दारु पिऊन किन्वा दारुची तयारी करुन..पेप्सि ची बाट्ली,एक plastic चा ग्लास आणि ’दारु’(specific असा brand नाही,मुळात chennai मधे govt चेच दारु ला permission दिलिये त्यामुळे local brands खुप आहेत)..एक दोन वेळा त्याला emotionally blackmail करुन दारु cigarette कमी कर सान्गाय्च प्रयत्न केला देखिल..पण "कौन कम्बखत दुख बर्दश्त करने के लिये पिता है, हम पिते है क्युकी timepass हो सके"..त्याच reason हेच होता...पिऊन out झालाय अस कधिच झाल नाहि..
त्याला एकुणातच चेन्नई बद्दल राग होता..त्यातुन मुम्बईकर असल्यमुळे ते शहर सोडुन चेन्नईत transfer होण त्याच्या जिव्हारी लागला होता.एका चान्ग्ल्या TV channel मधे कामाला होत..लग्न झाल होत..बायकोला दिवस गेले आणि recession मधे ह्याची नोकरी...दुसरया ठिकाणी job मिळाला आणि त्याची परी जन्मली..पण चेन्नईला transfer झाली..परी लहान अस्ल्यामुळे आणि इथल वातावरण एकतर वाईट.."इथ्ल्या लोकान्च्या घामाला देखिल साम्बार आणि रस्सम चा वास येतो" थोड्क्यात काय तर इथल खाण,लोक,शहर या बद्दल त्याच मत वाईट होत..
मी घरी जाताना मानसिक तयारी करुन जायचो..cigrette,दारु चा वास,फ़ोन वरची भान्ड्ण पण त्या दिव्शी काही तरी वेगळच घड्ल..घरात शिरल्यावर उद्बत्त्यान्च घमघमाट,छोटी छोटी खेळ्णी..’तो’ला १ आठवड्याची सुट्टी मिळाली होती..त्याच्या चेह्र्यावरचा आनन्द बघण्यासारखा होता.४ sizes चे frocks घेऊन आला होता."परी किति मोठी झालिये ग? हाथ भर लाम्ब कि अजुन छोटिशी आहे?"असे प्रश्न ऐकाय्ला मिळाले..त्याने परी जन्म्ली त्या दिवसाच वर्णन केल..OT च्या बाहेर tension मधे होता..एक nurse एका कपड्यात एका बाळाला घेऊन आले..म्हण्ली " लक्श्मी आलिये".."तिला हातात घेतला(परिला,nursela नाही) आणि ढ्साढ्सा रडायला लागलो..,आशय जेव्हा तु बाप होशिल तेव्हा मला नककी फ़ोन कर..."तो त्याच्या परीला कुशीत घेउन झोपल्याचा भास मला त्या रात्री झाला..
..पण दुसरया दिव्शी त्याची रजा cancel झाली..रात्र भर परी चा video बघत होता...रात्रिचा १ वाजला होता..मी कुस बद्लत होतो..तो भिन्तिला टेकुन बसला होता.."आशय?झोपलायेस का रे?"-’तो’
"ह्म्म,बोल",
"माझी परी मला ओळखेल का रे??"
माझे डोळे खाड्कन उघड्ले(हा प्रश्न माझ्यासाठी नव्ह्ताच मुळी)
"अरे वेडायेस का?ओळखेल की" मी उगाच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होतो...
एवढा एक प्रश्न विचारुन तो झोपला अन मी जागा रहिलो...
नुक्ताच सन्दिप खरे आणि सलिल कुलकर्णिच्या दमलेल्या बाबाची कहाणी ने बरयाच लोकाना रडवलेल..पण निदान ते बाबा आपल्या मुलान्न खर खुर तरी बघत अस्तिल...ह्या दमलेल्या पेक्शा एकटा पडलेल्या बाबाच काय??
आप्ल्या मुली च्या सग्ळ्यात छान moments ना miss करत होता तो...रोज दारु,cigrette ह्याचा दिवस सुरु व्हाय्चा आणि सम्पाय्चा..
हा नविन DEV'D' जिथे D stands for Daddy पहिल्यन्दच बघित्ला..

माझी परत पुण्याला यायची तयारी सुरु झाली...मी त्याच्या साठी एक branded full bottle whisky दिली..बाट्ली कडे काही वेळ बघितल न हसत म्हणला.."हे तर २ दिवसात सम्पेल,पुढे?"मी निघालो,तेव्ढ्यात हाक ऐकु आली "आयुश!!" (मला खरच राग आला होता..२ महिने होऊन देखिल शेवट्च्या दिवशी माझा नाव चुकिच घेतला" माझ्या हातावर ५१/- ठेवले ,"दगडुशेठ गणपतिला जा आणि पूजा कर,माझ्यासाठी नाही परी साठी"...
"नक्की"पैसे खिशात ठेवत मी म्हणालो..
"by the way एक गोश्ट विचारायची राहुनच गेली,परी च नाव काय रे ठेवलस?"
"आयुशी !!!"
मला नावामुळे आलेला राग गिळुन घराबाहेर पड्लो......

Friday, March 5, 2010

""क्वार्टर" लाइफ़ क्राइसिस !!!
(PS: Title marathit ahe n blog hi marathit ahe..pan english font madhe lihilay..reason?? kalelach )

"Walambe baryach diwasat kahi blog nahi lihilat..jara liha kahitari " asa koni mala mhanla asel asa ajibat samju naka..mich swatala vicharun majhi demand wadhwun ghetoy..lihayla ghetlay khara pan kharach crisis mhanje nakki kay he atta lakshat yetay...blog cha vishay clear ahe n title pan ekdum attractive , pan content shabdat nakki kasa mandaycha hech clear hot nahiye...life cha pan thodasa tasach zalay..n especially 20-25 hya age group chya mula-mulincha.india cha future mhane.. confused state of mind..mulansathi career, n mulinsathi lagna(exception are there)..pan sadhya barich wegle views ahet lokanche so ata mi hya issue war mulich lihinar nahiye..nidan ha blog lihitana ha issue handle karaycha nahi he tari clear hota..khara sangaycha tar sadhya kashachach kahi watat nahi..nidan confused state madhe "he changla ki te changla" hyachi dwidha manasthiti asaychi pan sadhya te pan kahi feeling yet nahiye..asa ka?? "saglya goshti ekdum clear ahet?" uttar-nahi,mag "saglya goshti milalyat?"-uttar- nahi, mag tari pan ka asa?
sadhya man confused nahi tar kodga zalay...
13 feb la punyat bombsphot zale..hi baatmi aiklyaar.."aho te tar honarach hote".."metros nantar punech rahila hota ki.."," nidan pudhche 5 warsha pune safe ahe..ata tithe kahi honar nahi " ,google,orkut,twitter che status messages dusrya mintala badalle gele..aho punyala demand ala hota..asha reaction aikayla milalya n swatachya tondun dekhil bolalya gelya."gelelyanchya aatmyala shanti milo "asa ekachya hi bolnyatun ala nahi..bombsphot hi gosht ekhadya joke sarkhi hatatlli geli..15 min news channel baghna zala..15min naatewaikanche phn zale..mitranna bhetlyawar tyawar natak kasa karta yeil hyachi charcha zali..n ghari yeun shant pane zopun gelo...
MBA kartoy mhanlya war roj chya roj paper wachlach pahije..baatmya kalo athwa na kalo pan roj sakali paper wachla gelach pahije pan kahi mahine kayam waiitach goshti kaanawar aikayla yetayet.blasts,earthquake,floods,stampede,swine flu,inflation..aajkal to paperwala "aaj ki taaja khabar chya aiwaji aaj ki taaja buri khabar mhanun oradto ki kay asa watatay"..
ata amhi hya goshtincha vichar karto asa nahi pan bagha kasa vichar karto te..
pratyekachya aayushyat saade sati yete..tasa pratyek rajyasathi saade aathi yete..(mi research kela ahe..udaharansakat spashtikaran deto)
mala kalayala laglyapasun cha data ahe...
year 1993- maharashtra
1.babri masjid tikde ayodhyet padli ,dangal amchya mumbait...
2.danglicha celebration karnyasathi sathi dawood ni kelele bombsphot...
3.sept'93- killari n latur cha bhukamp...
hya 3 goshtinni maharashtracha naaw jagachya kaanakoprayt pochla.

year 2001-02 Gujrat (8.5 years)
1.Godhra hatyakand,dangal
2.akshardham mandirawar atirekyancha halla
3.Bhuj cha bhukamp...

Year 2009-10--Andhra pradesh(8.5 years)
1.CM Y.Raj shekhar reddy cha mrutyu
2.Floods
3.Telangana issue

ajun 2 navin goshti ad zalyat..
4.Satyam scam..(progress in technology)
5.parwach news baghitli ..Indian naval/aurforce chi parade chalu hoti tar tyach plane eka building war yeun crash zala..ata hasawa ki radawa kahi kalat nahiye..

Year 2018--whos next ????

warti dileya goshti war jitka v4 sorry analysis mi kelay titka mi swatacha bhala kasa hoil hyasathi kela asta tar barach fayda zala asta..aso mudda ha nahiye ki kay ghadtay aju bajula..mudda ha ahe ewdha sagla ghadat asuanahi amhi kodgech..

ratri 10 wajle ki chatting/batting karat basaycha..college madhe samor ala tari "HI" na kelelya mitrala ping karaycha n taasbhar bolaycha n ti call centre wali bai jichyashi kadhi sambandh ala nahi tichyashi phn war 15 min bolaycha.."aga mi tula kaal scrap kelay wachla nahis ka?", " no aga,i will read today ha!! " asa mhanun samor asun dekhil nai bolaycha..ha amcha technology cha wapar...

barr modern zalo mhanaycha tar sadhi english hi bhasaha ghya..ingraj ewdhe sodun gele..tyachi kimmat fakta GRE cha score annyapurti rahiliye..nahitar sadhya sms language, ani marathi sms,chatting english madhe type karne ewdhach kay tya bhashecha upyog rahilay...

amche idols kon mhanayche..sadhya ekach nawachya 3 vyakti TV war sarkhya jhalatayet..
"Hi m Rahul,naam to suna hi hoga ?"
1.asa mhannara SRK..jo swatchya film chya publicity sathi kuthlya level la jau shakto he na bolta disun yetay..ewdha sagla hounahi filmfare award la tyacha saifu sobat underwear madhe host mhanun alach ki..
hyat waiit kuthay..hyala professionalism mhantat..hech tar amhi shiktoy..

2.apla gandhicha wanshaj naslela gandhi..local madhun mumbai firla mhane..
kiti wajta te nahi baghitla..dupari 12.30..sakali 8-10 chya welet virar- churchgate madhe chadun dakhaw mhanawa...watel te dein...

3.majha fav " ha..ha..hhha.." mhannara apla marathi matitla RAHUL mahajan...aho udya tyachaa lagna sorry swayamwar ahe...

TV he entertainment sathi ahe asa mhanat news channelchya imp goshti sideline karaychya n hya ashya controversies enjoy karaychya..sandhyakali news sathi TV lawawa tar hyach saglya goshti..shewti firun firun TOM n JERRY,charlie chaplin asa kaitari bagaht basaycha...
media wale kahi dakhawtat,te amhala baghwat nahi mhanun te sodun dyaycha..tom jerry baghitla ki kasa chan watata..
mi paper wachto na...pan shewatchya panapasun wachayla suru karto...chintu pasun.. ka?lahan zalyasarkha watata..???
ghantaaaa..waastawapasun paltoy apan...

thodkyat kay tar ekhadi QUARTER marlyawar doka kasa sunna hota ,jagashi kahich sambandh nasto,na konacha soyar na sutak tasa zalay sadhya,apan aplyach jagat..

saglach waiit nahiye ho..ek manus ahe jo shewatchya paanawarchi baatmi front page war anto ani main mhanje lokanna anand deto..to mhanje SACHIN..kharatar tyachi jaga hya blog mdhe nahi..pan tarihi mala ullekh karawa watla...
kadachit man itka pan kodga zalelaa nahi hyachi jaaniw asel hi...
aso
aapla man kodga zalela nahi hya anandat ata houn jau de ajun ek QUARTERRRRR!!!!

PS::Blog madhe kahi confusing adhalyas,majha quarter life crisis samjun sodun dya..faarsa v4 karu naka..