Friday, March 5, 2010

""क्वार्टर" लाइफ़ क्राइसिस !!!
(PS: Title marathit ahe n blog hi marathit ahe..pan english font madhe lihilay..reason?? kalelach )

"Walambe baryach diwasat kahi blog nahi lihilat..jara liha kahitari " asa koni mala mhanla asel asa ajibat samju naka..mich swatala vicharun majhi demand wadhwun ghetoy..lihayla ghetlay khara pan kharach crisis mhanje nakki kay he atta lakshat yetay...blog cha vishay clear ahe n title pan ekdum attractive , pan content shabdat nakki kasa mandaycha hech clear hot nahiye...life cha pan thodasa tasach zalay..n especially 20-25 hya age group chya mula-mulincha.india cha future mhane.. confused state of mind..mulansathi career, n mulinsathi lagna(exception are there)..pan sadhya barich wegle views ahet lokanche so ata mi hya issue war mulich lihinar nahiye..nidan ha blog lihitana ha issue handle karaycha nahi he tari clear hota..khara sangaycha tar sadhya kashachach kahi watat nahi..nidan confused state madhe "he changla ki te changla" hyachi dwidha manasthiti asaychi pan sadhya te pan kahi feeling yet nahiye..asa ka?? "saglya goshti ekdum clear ahet?" uttar-nahi,mag "saglya goshti milalyat?"-uttar- nahi, mag tari pan ka asa?
sadhya man confused nahi tar kodga zalay...
13 feb la punyat bombsphot zale..hi baatmi aiklyaar.."aho te tar honarach hote".."metros nantar punech rahila hota ki.."," nidan pudhche 5 warsha pune safe ahe..ata tithe kahi honar nahi " ,google,orkut,twitter che status messages dusrya mintala badalle gele..aho punyala demand ala hota..asha reaction aikayla milalya n swatachya tondun dekhil bolalya gelya."gelelyanchya aatmyala shanti milo "asa ekachya hi bolnyatun ala nahi..bombsphot hi gosht ekhadya joke sarkhi hatatlli geli..15 min news channel baghna zala..15min naatewaikanche phn zale..mitranna bhetlyawar tyawar natak kasa karta yeil hyachi charcha zali..n ghari yeun shant pane zopun gelo...
MBA kartoy mhanlya war roj chya roj paper wachlach pahije..baatmya kalo athwa na kalo pan roj sakali paper wachla gelach pahije pan kahi mahine kayam waiitach goshti kaanawar aikayla yetayet.blasts,earthquake,floods,stampede,swine flu,inflation..aajkal to paperwala "aaj ki taaja khabar chya aiwaji aaj ki taaja buri khabar mhanun oradto ki kay asa watatay"..
ata amhi hya goshtincha vichar karto asa nahi pan bagha kasa vichar karto te..
pratyekachya aayushyat saade sati yete..tasa pratyek rajyasathi saade aathi yete..(mi research kela ahe..udaharansakat spashtikaran deto)
mala kalayala laglyapasun cha data ahe...
year 1993- maharashtra
1.babri masjid tikde ayodhyet padli ,dangal amchya mumbait...
2.danglicha celebration karnyasathi sathi dawood ni kelele bombsphot...
3.sept'93- killari n latur cha bhukamp...
hya 3 goshtinni maharashtracha naaw jagachya kaanakoprayt pochla.

year 2001-02 Gujrat (8.5 years)
1.Godhra hatyakand,dangal
2.akshardham mandirawar atirekyancha halla
3.Bhuj cha bhukamp...

Year 2009-10--Andhra pradesh(8.5 years)
1.CM Y.Raj shekhar reddy cha mrutyu
2.Floods
3.Telangana issue

ajun 2 navin goshti ad zalyat..
4.Satyam scam..(progress in technology)
5.parwach news baghitli ..Indian naval/aurforce chi parade chalu hoti tar tyach plane eka building war yeun crash zala..ata hasawa ki radawa kahi kalat nahiye..

Year 2018--whos next ????

warti dileya goshti war jitka v4 sorry analysis mi kelay titka mi swatacha bhala kasa hoil hyasathi kela asta tar barach fayda zala asta..aso mudda ha nahiye ki kay ghadtay aju bajula..mudda ha ahe ewdha sagla ghadat asuanahi amhi kodgech..

ratri 10 wajle ki chatting/batting karat basaycha..college madhe samor ala tari "HI" na kelelya mitrala ping karaycha n taasbhar bolaycha n ti call centre wali bai jichyashi kadhi sambandh ala nahi tichyashi phn war 15 min bolaycha.."aga mi tula kaal scrap kelay wachla nahis ka?", " no aga,i will read today ha!! " asa mhanun samor asun dekhil nai bolaycha..ha amcha technology cha wapar...

barr modern zalo mhanaycha tar sadhi english hi bhasaha ghya..ingraj ewdhe sodun gele..tyachi kimmat fakta GRE cha score annyapurti rahiliye..nahitar sadhya sms language, ani marathi sms,chatting english madhe type karne ewdhach kay tya bhashecha upyog rahilay...

amche idols kon mhanayche..sadhya ekach nawachya 3 vyakti TV war sarkhya jhalatayet..
"Hi m Rahul,naam to suna hi hoga ?"
1.asa mhannara SRK..jo swatchya film chya publicity sathi kuthlya level la jau shakto he na bolta disun yetay..ewdha sagla hounahi filmfare award la tyacha saifu sobat underwear madhe host mhanun alach ki..
hyat waiit kuthay..hyala professionalism mhantat..hech tar amhi shiktoy..

2.apla gandhicha wanshaj naslela gandhi..local madhun mumbai firla mhane..
kiti wajta te nahi baghitla..dupari 12.30..sakali 8-10 chya welet virar- churchgate madhe chadun dakhaw mhanawa...watel te dein...

3.majha fav " ha..ha..hhha.." mhannara apla marathi matitla RAHUL mahajan...aho udya tyachaa lagna sorry swayamwar ahe...

TV he entertainment sathi ahe asa mhanat news channelchya imp goshti sideline karaychya n hya ashya controversies enjoy karaychya..sandhyakali news sathi TV lawawa tar hyach saglya goshti..shewti firun firun TOM n JERRY,charlie chaplin asa kaitari bagaht basaycha...
media wale kahi dakhawtat,te amhala baghwat nahi mhanun te sodun dyaycha..tom jerry baghitla ki kasa chan watata..
mi paper wachto na...pan shewatchya panapasun wachayla suru karto...chintu pasun.. ka?lahan zalyasarkha watata..???
ghantaaaa..waastawapasun paltoy apan...

thodkyat kay tar ekhadi QUARTER marlyawar doka kasa sunna hota ,jagashi kahich sambandh nasto,na konacha soyar na sutak tasa zalay sadhya,apan aplyach jagat..

saglach waiit nahiye ho..ek manus ahe jo shewatchya paanawarchi baatmi front page war anto ani main mhanje lokanna anand deto..to mhanje SACHIN..kharatar tyachi jaga hya blog mdhe nahi..pan tarihi mala ullekh karawa watla...
kadachit man itka pan kodga zalelaa nahi hyachi jaaniw asel hi...
aso
aapla man kodga zalela nahi hya anandat ata houn jau de ajun ek QUARTERRRRR!!!!

PS::Blog madhe kahi confusing adhalyas,majha quarter life crisis samjun sodun dya..faarsa v4 karu naka..

Saturday, November 14, 2009

Job Satis'FAKE'tion

साल १९८०:-"मुलगा टाटा मोटर्स (तेव्हाचा टेलको) मधे लागला की घराला लाइटिंग !! रीटायर होई पर्यंत चिंता नाही "(हे वाक्या एका प्रख्यात शास्त्रिया गायकचा आहे माझा नही)

साल २०१० :-"मुलगा एका कंपनी मधे १ वर्षाहून जास्त वेळ टिकला तर घराला आणि कंपॅनिला दोघांनाही लाइटिंग !!!"(हे माझा आहे) गेल्या ३० वर्षांमधला हा फरक..
कारण :-" जॉब सॅटिस्फॅक्षन " (असा आजच्या / आमच्या / आपल्या पिढीचा म्हणणा आहे) आहे तरी काय हे जॉब सॅटिस्फॅक्षन ??कशावर डिपेंड करता??
१) तुमची कंपनी?
२)तुमचे सहकारी?
३)तुमचा पगार?
४)तुमचा काम?
५)तुमची इच्छा??
वरचे मुद्दे म्हणले तर एकमेकात गुंतलेले आहेत किंवा म्हनला तर अगदी वेगळे सुधा आहेत..
उ १) कंपनी- company is a artificial person created by law having seperate legal entity हे कंपनी चा पुस्तकि डेफिनेशन आहे..त्यामुळे जी गोष्टा मुळात अस्तित्वातच नाही त्याच्या मुळे नोकरी पकडना आणि मग सोडना हे जरा ना पटण्यासारखा आहे..त्यामुळे कंपनी चांगली नव्हती हे तर कारण होऊच शकत नाही
उ २) सहकारी :- एका स्मधे हे निष्पन्न झाला की जॉब स्विच किंवा सोडण्यमागे सगळ्यात महत्वाचा कारण म्हणजे त्यांचे बॉस , आणि इतर सहकारी हे आहे (MBA मधे आधी हेच शिकवला) पण लोकांचा काय घेऊन बसता ? आज आहेत ते उद्या नाहीत..आणि काय गॅरेंटी की दुसर्या कंपनी मधे तसेच लोका नसतील? त्यामुळे हे कारण सुधा जरा पटत नाही..
उ ३) पगार :- इतके दिवस वाटत होता की पगार हा सुधा एक मोठा घटक आहे ..पण गेल्या वर्षी सुरू झॅलेल्या "रिसेशन"/स्लोडाउन " मधे हा घटक सुधा दुय्यम वाटायला लागलाय..खूप जास्त पगार देणार्‍या नोकर्‍या बुडल्या..

उ४) काम::हा थोडा कळीचा मुद्दा आहे..कारण सध्या कुठला ही इंजिनियर सॉफ्टवेर मधे चालतो..त्यामुळे वर्षभराणंतर त्यातला इंट्रेस्ट कमी होणा साहजिक्कच आहे..पण तरीही एकदा सॉफ्टवेर चा शिक्का बसला की पुडे आपल्या आवडत्या फील्ड मधे परत काम करता येईलच असा नाही..

उ ५)इच्छा :: हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे माझ्या दृष्टीने .भलेही तुमचा बॉस ,सहकारी वाईट असुदेत पण जर तुमची खरच काम करायची इच्छा असेल ना तर मग कारकुनी नोकरी सारखी १०-५ , कुणाच्या अध्यात ना मध्यात पडता मुंडी खाली घालून काम करून निघायचा..पण काही वेळा इच्छा असते पण ह्या इतर बाबी इतक्या डोक्याला त्रासदयक असतात किती सोडून गेलेला बरा असा वाटायला लागता..पण जसा म्हनला की हे मुद्दे अगदी वेगळे सुधा आहेत किंवा अगदी गुंतलेले सुधा.. आता कारकुनी लोकाबद्दल सांगायची काही गरज नाही..कारण त्यांना बर्‍याचदा गरज असते म्हणून तसा काम करावा लागता पण काही लोका असतात जी अनेक वर्षा अगदी आवडीने तेच काम ना कंताळता ,कितीही खवचट लोका त्यांच्या आयुष्यात येउदेत ते काम करतच राहतात..

अशी ५ लोका मी बगीतलियेत(मार्केट रिसर्च केलाय :))
१) देव आनंद(का?? सांगतो)
२)पंडित जसराज
३)एम एफ हुसैन
४) सचिन तेंडुलकर
५) एन एम कुलकर्णी(पुण्यात ११वि-१२वी चे गणिताचे क्लास घेतात)

आता हीच लोका का? तर ५ही लोका थोड्या का होईना वेगळ्या फील्ड मधली आहेत..म्हणजे कला-क्रीडा ते अगदी प्रोफेशनल पर्यंत

उ १) देव आनंद: भारतीया चित्रपट सृष्टी मधले अनेक दिग्गजान्मधून ह्याचीच निवड का केली?? तर त्या मागे काही ऑब्ज़र्वेशन्स आणि सर्वे आहे..देव आनंद हा त्रिमूर्ति मधला एक म्हणजे १९५०-६० च्या दशकात देव-राज-दिलीप ह्या तिघांनी राज्या केला..सगळे एक्से एक सिनेमे..त्यातून देव अनाद चे गाइड ,ज्यूयेल थीफ सारखे अजरामर सिनेमे(बघितले नसतील तर जरूर बघ) देव आनंद चा शेवटच हिट सिनिमा म्हणजे हरे राम हरे कृष्णा (१९७०) त्यानंतर आजतगाय्त त्याचा एकही पिक्चर हीट काय थियेटर मधे सुधा लागला नाही पण तरीही त्याने सिनिमा काढायचा थांबवला नाही..दर २ वर्षाला एखादा तरी बोगस पिक्चर तो काढतोच..का?? काय हौस आहे एवढी??एखादा असता तर सन्मानने रिटाइयर्मेंट घेतली असती आणि अवॉर्ड फंक्षन ला म्हणा किंवा गेस्ट अपीयरेन्स देत बसला असता एखादा ...पण नाही..इच्छा !!!लोका काही म्हणू देत मी पिक्चर काढणार लोकांना आवडू दे अथवा नको मला आवडता मी काढणार.. हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन !!!

उ २) पंडित जैसराज:: संगीत मार्तंड हा मान मिळवणारे..वय वर्षा ८०+ ..सगळा आयुष्या गाण्याचा रियाझ , मैफिली ह्यात गेला अनेक सण समारंभला ते गायला असत..पण उमेदि,कमवण्याच्या वयात ठीक पण अजूनही दिवाळी पहाट ला कुठे तरी त्यांची मैफिल असतेच..का?? छान घरी बसावा सण साजरा करावा,अभ्यांग स्नान,फराळ करावा..पण नाही..अजूनही तीच स्वर साधना..तीच इंटेन्सिटी . श्रोत्यांना मंत्रमुग्धा आणि स्वाताचा आत्मा सुखी करण्याची इच्छा ...कोणी ऐकायला येऊडे किंवा नको..मी गाणार हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन!!!

उ३)एम एफ हुसैन वय वर्षा ९४..इतके वर्ष चित्रा काढली पण ह्या वयात नुसता ब्रश जरी हातात धरला तरी थारथरण्या मुळे आपोआप चित्रा काढला जाईल..आणि इतका नाव ऑलरेडी झॅलेला आहेच की काही जरी चित्रात असला तरी ते मॉडर्न आर्ट म्हणून करोडो रुपयन्ना विकला जाईल..पण तरीही काहीतरीई भन्नाट चित्रा काढून त्यावर होणारी कॉँट्रोवेर्सीला तोंड द्यायला तयार.(भारत मातेचा नग्न चित्रा त्यांनी काढला होता..त्यावरून वाद होणार हे त्या पेंटिंग मधल्या भारत मातेल सुधा माहिती होता..)तरी ते चित्रा काढला ..कारण इच्छा!!! अरे हो तो गजगामिनी चा उल्लेख राहिलाच..त्यात माधुरीची ची पाठ त्याने २०मिन दाखवली होती..असो तो सिनिमा त्यांच्या चित्रान्न सारखाच होता.. हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन

उ४) सचिन तेंडुलकर:: एकदिवसीया मधे १७०००+ धावा (२रा नंबर ला कोण आहे ते माहीत नाही पण त्याच्या १२००० धावा आहेत फक्ता) सेंचुरीस:४५ (२रा -२६ सेंचुरीस) टेस्ट मधे थोडी कॉंपिटेशन आहे..पण तरीही पॉंटिंग खेळपर्यंत सचिन खेळेल..त्यामुळे फारसा टेन्षन नाही.. आज त्याला २० वर्षा झाली डेबु करून...किती लोकांचे करियर त्याने बघितले,कपिल देव पासून ते ईशांत शर्मा,रवि शास्त्री पासून अमित मिश्रा आणि त्यामधे येणारे किमान २०० खेळाडू त्याने बघितले असतील..मॅच फिक्सिंग चा प्रकरण,वर्ल्ड कप फाइनल मधे हार,२००७ मधे आधीच बाहेर पडले ,सिड्नी टेस्ट मधली कॉंट्रोवर्सी अशा गोष्टी आहेत..इनकम तर विचारायलाच नको..एखादा असता तर मस्त रिटाइयर्मेंट घेऊन कॉम्मेंटर्य करत बसला असता..पण नाही अजूनही तीच १६ वर्षा च्या मुलसारखी एग्ज़ाइट्मेंट ..उलट जास्त जोश,शेवटचे काही दिवस राहिलेत त्यामुळे अजुन जास्त पेटून खेळतो तो..परवाच्या १७५ च्या इन्निंग बद्दल तर काही बोलायलाच नको..३५० चे बरोबर अर्धे १७५ त्याने केले आणि बाकीच्या १० लोकांना तेवढे सुधा करता आले नाहीत.. त्याचा खेळ पाहून १६ वर्षा चा energitic मुलगा २० वर्षाचा अनुभव आहे असा खेळात होता.. का???इच्छा!!! हे म्हणजे जॉब सॅटिस्फॅक्षन...

उ५)एन एम कुलकर्णी::हे उदाहरण घायचा कारण की मी स्वता ह्यांना काम करताना बघितलाय..आधीचे ४ लोका कायम बातम्या किंवा टी वी माधेच बघितले...हा माणूस गेले १५-२० वर्षा गणिताच शिकवटोय न ते सुधा फक्ता ११-१२वी..सकाळी ५.३०ला पहिली बॅच सुरू होते ते रात्री १०.३० ला संपते.. १० बॅचस १२वी च्या आणि ३-४ ११वी च्या..आम्ही त्याच्या आन्यूयल इनकम काढला होता २००१ साली..तर सगळा कट करून ५५-६०लाख त्यांच्या हातात पडत असतील..आता असा असता तर २ वर्षा नंतर सगळा सोडून आरामात कोट्याधीश होऊन राहीले असते..पण नाही सकाळी त्याच लॅडीस साइकल वर येणार,गुरुवारीच सुट्टी देणार न फक्ता दिवाळीचय २ सुट्ट्या..असा त्यांचा दिनक्रम.. का?? इच्छा!!! ह्याला म्हणतात जॉब सॅटिस्फॅक्षन...

हा बराच चर्चेचा विषय आहे..त्यामुळे चर्चा झाल तर उत्तम..इतरांशी नाही तरी स्वतशी चर्चा करा..नक्की काय हवाय???माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचल्या असतील तर तुमच्या भावना कळू द्या जर नसतील काही तर भाव ना देता वाचा आणि जर उत्तर मिळाला तर मला पण सांगा..तेवढाच मला सॅटिस्फॅक्षन मिळेल :)

Saturday, October 17, 2009

My 'GF' - Guilt feeling....

स्थळ :-.शिवाजीनगर बस स्टॉप वेळ:- रात्री ७.३० एक माणूस साधारण 30-35 चा ,किरकोळ शरीर्यष्टी आणि हातात सूटकेस..
तो:-" हडपसर किती लांब आहे इथून?". .
मी :-" साधारण १५ की मी आहे." तो:- "रिक्षा ने . किती वेळ लागेल आणि किती रु घेतील??"
(.असे उगाच प्रश्ना विचारले की माझा डोका फिरता.) .मी (अत्यंत त्रसीक पणे):- 20मी आणि 70-80 रु
तो:-".आणि बस नि?"
मी( अजुन चिडून):- अर्धा तास आणि 25 रु तो:-"..आणि चालत??" मी (त्याच्याकडे लक्षा ना देता):-" 1.5-2 तास "
तो:-"धन्यवाद"(नंतर काहीच बॉलला नाही) .
पण काही क्षणा नंतर मला स्ट्राइक झला..परत ते शब्दा कानात घुमले.."चालत??" मी त्या माणसाकडे बघितला पण तो पर्यंत तो चालत निघाला होता..त्या गर्दीत तो मला दिसेनासा झाला ..मी सुन्ना होऊन त्या गर्दी मधे शोधत होतो .. .तो माणूस खरच चालत गेला??पुढे त्या माणसाचा नक्की काय झला ह्याचा सतत विचार माझ्या डोक्यात होता..कदाचित त्याची मानसिक आणि शारीरिक तयारी असेल देखील चालत जायची...पण मी जर त्याला 10 रु दिले असते तर माझ्यावर काही आभाळ कोसळणार नव्हता...त्याने भीक वागेरे सुधा मागितली नव्हती तरी मी इतका तुसडे पानाने वागलो.. आता ही काही फार मोठी घटना नाहीए पान तरी उगाच मनाला चूटपुट लाउन जानारे प्रसंग आहेत. हे जे येणार गिल्ट फीलिंग असत ना ते फार वाईट असत. ऐन दिवाळी च्या दिवशी असा का लिहितोय मी?? मला पण नाही माहीत पण गेल्या १ महिन्यात काही अशा घटना घडल्यात जुन्या गोष्टी आठवल्या आणि लिहावसा वाटला ...

नाव: अक्षय ताठे
वय: 22 माझ्याशी
संबंध:: आम्ही दोघा कॉलेज च्या एका फंक्षन साठी बंगलोर ला ५ (१०-१५ सप्टेंबर) दिवस एकत्र होतो..ओळख फारशी नाही..तो मला कॉलेज मधे एक वर्षा सीनियर पण वयाने १ वर्षा ने लहान .मूळचा नागपूरचा...मुंबईच्या एम बी ए कॉलेज ला अड्मिशन मिळून देखील त्याची गर्ल फ्रेंड पुण्यात असते म्हणून त्याने इथे अड्मिशन घेतली..रिसेशन च्या काळात देखील आय बी एम मधे प्री प्लेसमेंट ऑफर..घरात एकुलता एक. सगळा अगदी सेटल्ड ..एकदम मन मिळाउ. पण त्याच्या नशिबात काहीतरी वेगाळच लिहिला होत..१५ ला पुण्यात आल्यावर २० ला तो आणि काही मित्रा दिवे अगर ला गेले..पोहता येणार्‍यांपैकी हा एक..इतर ५ लोकं सोबत पाण्यात गेला..पण परत आलाच नाही..अचानक हाइ टाइड आली ,वाळू सरकली आणि तो अडकला..बाकीचे ४ वाचले पण हा नाही..असेल काहीतरी चुक पण ती एवढी महाग पडेल असेल कोणाला वाटला ही नव्हता..इतर ४ लोका १० दिवस कॉलेज मधे येउच शकले नाहीत ..आमचा जीव वाचला ह्या आनंदापेक्षा त्याचा जीव वाचावता आला नाही ह्याचा गिल्ट फीलिंग होता सगळ्यांना...
एक क्षण होत्याचा नव्हता करू शकतो..
वय वर्षा २२ ....

नाव:: अथर्व साठे
वय:१५ (१० वी) माझा
संबंध: माझ्या मैत्रिणीच्या बहिणी च्या वर्गात शिकत होता... शाळेत कायम पहिला ,पंडित विजय कोपरकरांकडे शास्त्रिया शिकायचा..कट्यार काळजात घुसली मधे अभिनय आणि गायन असा दोन्ही करायचा, १०वि तच आय आय टी चा ध्येय बाळगणारा..रविवार खडकवासल्याला सायकलिंग करत जाण्याचा प्रोगराम होता..थोडी प्रॅक्टीस हवी म्हणून घरातून सायकल घेऊन बाहेर पडला..मृत्युंजेश्वर जवळ पी एम टी ची धडक बसली आणि १२ दिवस कोमात गेला..काही दिवसांपूर्वी गेला.. त्या १५ वर्षाच्य पोराने काय इतका पाप केला की थेट जीव गमवावा लागला??
परत एक क्षण..
वय वर्षा १५.....
ब्लॉग मधे त्यांचा उल्लेख करायचा हेतू उगाच सहानू भूति किंवा आरेरे किती वाईइट झला अश्या रिॅक्षन अपेक्षित नाहीयेत..पण खरच एकदा आपण काय काय गोष्टी केल्यात ह्याचा विचार केलाय का??.. बरेच लोका म्हणतील की लाइफ खूप अनसर्टन आहे तर जे काही करायचा राहून गेला असेल तर ते करून घाया..एन्जॉय करा..पण त्याधी जर आपल्या हातून कोणी दुखावला गेला असेल तर एकदा सॉरी म्हणा,कोणी मदत केली असेल तर थॅंकस म्हणा...नाती जपा...आपल्याला समजून घेणारे,माफ करणारे खूप लोका आहेत..त्यांना जोडा..इमॅजिन करा दिवाळीत एक पण मेसेज,फोन नाही आला तर खरच दिवाळी वाटेल तुम्हाला?? अहो हे सण समारभ एकत्र येण्याचा एक कारण आहे..नका मिस करू ह्या गोष्टी.. रस्त्यात कुठे अपघात झाला असेल तर कोणी तरी येईल आणि हॉस्पिटल मधे नेतील असा म्हणून आपण अनेकदा त्यांच्या बाजूने निघून गेलॉय..हू केर्स ??? ह्या आटिट्यूड नि बराच वागलोय.. अनेकदा मित्राना,नातेवाईकानना भेटण्यात काही इण्टरेस्ट नाही म्हणून जरा काम आहे सो भेटटा नाही येणार अशी सरळ थाप मारुन घरात तंगड्या वर करून टीवी बघत लोळत पडलोय...का?? मित्रा ना सांगू शकत नव्हतो मी की बाबानो आज मला जाम बोर झाला आहे मी काही आज तुम्हाला भेटू शकत नाही...
३-४ महिन्यात एकदा क्धीतरी नातेवाईक भेटनार पण कुठे त्यांचे प्रश्ना ऐकायचे " नोकरी का सोडली?, किती वर्षा अजुन शिक्षण?? " त्यांच्याशी आमची फ्रीक्वेन्सी जूळत नाही असा आई ला कारण सांगून तिला खोट बोलायला लावायचा.. पण जर १ तास थोबाड् दाखवून आलो असतो तर काय एवढा आभाळ कोसळणार होता?? नंतर ह्या गोष्टीचा विचार करत बसायचा आणि मला गिल्ट फीलिंग आलाय असा म्हणायचा...

झाला गेला विसरून जा हे म्हणतात ते खराय पण जर आपल्याशी कोणी वाईइट वागला असेल तर ते विसरा..तुम्ही तसे वागले असाल तर लक्षात ठेवा.. असे विचार बर्‍याच सिनिमा,नाटक आणि साहित्यिकांन कडून ऐकले वाचले असतील..आज एका मित्राचा ऐका...सकाळी उठताना कुठलाही गिल्ट फीलिंग घेऊन उठउ नका...जर लक्षात येत नसेल तर आठवा..आणि आठवणीने फोन,मेसेज करा... आपल्याला दिवाळी आणि आयुष्या शुभ करायची संधी मिळलीये असा समजा ...
लाइफ खूप अनसर्टन आहे.
.एक क्षण पुरेसा ठरतो....
वय वर्ष......

Tuesday, August 18, 2009

कमोड

"डिसक्लेमर:: खलचा ब्लॉग हा अत्यंत हिडिस आहे..परत म्हणू नका की आधी सांगितला नाही...ह्यात सांगण्यात आलेल्या गोष्टींचा वाचकांच्या (जीवित अथवा मृत ) आयुष्याशी काही साधर्मया आढळयास तो योगायोग नसून अनुभव समजावा" ज्यांना शीर्षकावरून हा ब्लॉग घाण असेल असा वाटताय त्यांनी पुढे वाचू नये...पण मी लिहिणार आहे...कारण ह्या गोष्टीचा महत्व मला नुकताच कळलेला आहे आणि ते म्हणतात ना की आपल्याकडे जी वस्तू नसते त्याची किमत आपल्याला कळते ,माझ्यबाबतीत तसाच काहीसा झाला आहे..वाचाकांमधे काही लोकांनी लहानपणा पासूनच त्याचा वापर केला असेल त्यामुळे त्यांना कदाचित वाचताना बोर होईल..पण आमच्या सारख्या लोकांनी ज्यांनी लहानपणा पासून स्वदेशी पध्धत वापरली आहे त्यांना विशेष कौतुक आहे गोष्टीचा...तसा बघायला गेला तर इंडियन स्टाइल ही एकदूम पर्फेक्ट आहे...बरोबर आपल्या पोटावर प्रेशर येता आणि पुढच्या गोष्टी आपोआप घडतात पण मला वाटता की ही स्टाइल अवलंबण्यमागे सुधा एक कारण आहे...ते म्हणजे लोकसंख्या...पहिल्यापासूनच वाडा संस्कृती आपण पाळत आलो आहे..जॉइंट फॅमिलीस जिथे 10-15 लोका एका घरात राहत असतात...त्यामुळे त्यांच्या कडे निवांत बसून असल्या गोष्टी करायला वेळच नसतो..निसर्गा पुढे हात टेकले म्हणतात ना ते खराय..कोंबड जसा ना चुकता सकाळीच आरवतो तसा ह्या क्रियेचा आहे...त्यामुळे झक मारत पटपट उरकायला लागता..आणि तीच वाडा संस्कृती पुढे मिड्ल क्लास लोकान मधे आली..पण वेस्टर्न कल्चर मधे आपल्याला ते आढळून येत नाही...डोळ्यासमोर नेहमी पेपर वाचत बसलेला माणूस दिसतो...तिथल्या पेपर वल्यांचा धंदा कसला चालत असेल..एकाच घरात 2 पेपर ..एक बाहेर आणि एक आत.. आता 'कमोड' हे नाव का पडला असेल असा प्रश्ना पडणा साहजिकच आहे पण मराठीत संधी सोडवा असा प्रश्ना असायचा तसा ट्राइ करून बघितला आणि उत्तर सापडला "कम-ओढ' म्हणजे अशी जागा जिथे कमी ओढाताण करायला लागते...आता ही गोस्ता मला कुठे सुचली तर त्याची जागा सुधा तीच आहे(फक्ता नशीब म्हणा की उत्तर सूचल्यावर मी आर्किमेडिस सारखा 'युरेका युरेका ' म्हणत नाही उठलो..)..मोठ्या मोठ्या लोकांनी मान्या केला आहे की सगळ्यात जास्त कॉन्सेंट्रेशन कुठे होत असेल तर ते तिथे आहे(तुमच्या मधले 99% लोका मान्या करतील).. आता ह्याची खरी महती जेव्हा आपल्या पचन प्रक्रियेत बिघाड होतो आणि जेव्हा सारख्या वार्‍या कराव्या लागतात तेव्हा कळते....पण शाळेत ज्यांनी खूप उठा बश्यांची शिक्षा भोगली असेल त्यांना फारसा काही प्रॉब्लेम येईल असा वाटत नाही..तसाच जे रेग्युलर जिम ला जौन बैठका मारतात त्यांना सुधा फारसा त्रास नाही होणार.. कमोड चे जसे फायदे आहेत तसे तोटे..मी आता त्याचा वर्णन करणार नाहीए...पण एक सगळ्यात मोठा प्रश्ना जो पडला तो म्हणजे की फ्लश चा नोब आहे मागे का असतो?? कसरत होते ..का लोका उलटी बसतात?? मला खरच काळात नाही..मस्त कार च्या गियर सारखा साइड ला द्यायचा...त्याचा जर काही सायंटइफिक कारण असेल तर प्लीझ सांगा मला... असो तर माझा असा मत आहे की एका घरात दोन्ही प्रकार असावेत..म्हणजे वेळ आली की उपयोगी पडता.. तर अश्या ह्या अत्यंटा हिडिस आणि विकृत ब्लॉग ची सांगता एका हिडिस गाण्यानी करावैशी वाटते.. "मैं नीकला चडडी लेके रस्ते पे ,सडक पे.. एक कमोड आया..मै उथ्थे ***** छोड आया..." पी : एस :: शक्यतो कॉमेंट्स शब्दान मधे टाका..ईईई,शिईईइइइइइइइइइइइई असला काही टाकु नका

Saturday, August 15, 2009

Y'Z" bridge ???

मला 100% खात्री आहे की जवळपास सगळ्यांनीच ह्या शीर्षकाचा नको तो अर्थ घेतला असणारे..पण त्याला काही इलाज नाही कारण आपली मेण्टालिटच तशी झाली आहे..असो पण तुम्हाला जसा वाटताय तसा ह्याचा अर्थ आत्ता तरी घेऊ नका..मी शीर्षक एस एम एस लॅंग्वेज मधे लिहिला आहे..'वाय झेड ब्रिड्ज म्हणजे व्हाय ज़ेड ब्रिड्ज ?? असा म्हणायचा होता मला..आता ह्या विषयावर ब्लॉग का लिहावसा वाटला मला तर त्याला कारण मला बर्‍याच दिवसांपासून पडलेले प्रश्ना आणि त्या पूलावर घडणार्या गोष्टी आहेत...पुण्यातील सगळ्यात गजबजलेल्या 2 रस्त्यांना जोडणारा हा पूल. लक्ष्मी रोड आणि जे एम रोड . तसा बघितला तर लाकडी पूल(जो आता लोखंडी आहे), ओंकारेश्वर चा पूल असे 2 पूल ह्या रोड वर आहेत .पण झेड ब्रिड्ज चा विशेष कौतुक आहे...तुम्ही जे एम रोड वरुन त्या पूलवरून निघालात तर गेल्या गेल्या लगेच डावीकडे त्या पूलाने पोक काढले आहे..हे बघितल्यवर लक्षात येता की हा पूल खूप विचार करून बांधण्यात आलेला अहे. ती पोक आलेली जागा केवळ प्रेमी युगूलनसाठी चा कट्टा आहे. कॉर्न वाले,भेळ वाले ह्यांचा जबरदस्त खप होतो त्या ठिकाणी..उद्या जर एखादा झेंडेवाला सुधा तिकडे उभा राहिला(15 ऑगस्ट,26 जानेवारी व्यतिरिक्ता) तर त्याचा सुधा खप होईल..अहो तिकडे येणारे लोका दिल्दार असतात..ते इतके खुश असतात की इतरांना ही खुश करत असतात(अर्थात वेग वेगळ्या पध्धतिने)...बर्‍याच वेळा त्या पूला वरुन गेलॉय..अजुन एक गोष्टा लक्षात आली ती म्हणजे त्याचा फूटपाथ हा त्याच्या रस्त्या इतकाच रुंद आहे..म्हणजे नगरपालिकेचा खरच कौतुक केला पाहिजे..ह्या अश्या युगुलांनसठी बांधलेला हा स्पेशल पूल...2 मन एकत्र आणणारा हा पूल..आता मला सांगा पुण्यातले बाकी सगळे पूल सरळ आहेत हाच एक का तेवढा लांब आणि झेड ह्या अकारचा??अजुन एक बेसिक प्रश्ना आहे मला सिविल इंजिनीर् लोकांना..पूल हा कायम सरळच का बांधतात?? तिरका नाही का बांधून चालत??.. असो तर मुद्दा काय आहे की काही लोका जी खूप आरडा ओरड करताहेत की पूलवर असंख्या जोडपी बसलेली असतात त्यांना तिथून हाकलला पाहिजे..अहो पण का?? तुम्ही गाडी फूटपाथ वरुन चालवता का रस्त्यावरून?? रस्त्यावरून जाताना ते काय करतायत हे काही दिसत नसता..एकदूम सिस्टेमॅटिक असता सगळा..गाडी फूटपाथ च्या कडेला पार्क करतात आणि इंजिनच्या मागे बसून स्वाताचा इंजिन सुरू करतात...कधी भाजत नाही का त्यांना?? असो रस्त्यावरून काही दिसत नाही म्हणल्यावर मी एकदा फूटपाथ वरुन पण चालत गेलॉय काही दिसता का बघायला अहो पण खरच सांगतो काहीच दिसत नाही..मला काय तर त्यांना सुधा एकमेकांचे चेहरे दिसत नाही(प्रेम आंधळ असता ह्यालाच म्हणत असतील)..हा अपवाद फक्ता काही दिवसांच्या जेव्हा तिकडे सर्कस आणि जत्रा भरते तेव्हा..तेव्हा अगदी लखकलखीत प्रकाश असतो... ज्या लोकांना ह्या प्रेमी युगुलांवर राग आहे त्यांनी कृपया आपल्या गाडी चालवण्यावर लक्षा द्यायवे...साहजिक्कच आहे जुन्या पिढीला हे पचवण आणि बघणा अवघड आहे ..अहो पेठेतल्या संस्कृती आणि जे एम रोड च्या मॉडर्न आणि पश्चिमच्या संस्कृती ला जोडणारा हा पूल आहे..आणि पुलाची लांबी लक्षात घेता पेठेतल्या लोकांना जे एम रोड वर जायला थोडा तरी वेळ लागणारच ना..थोडक्यात काय की त्या पुलाचा आलेला पोक,त्याची लांबी(अनेक जोडप्यांना सामावून घ्यायची त्याची क्षमता),त्याचा रुंद फूटपाथ यामुळे WHY 'Z' bridge ह्याचा उत्तर मिळता पण ज्यांना अजूनही त्यावर चालणार्‍या गोष्टींचा राग आहे त्यांच्या साठी मात्र हा Y 'Z' bridgech राहणार आहे....

Thursday, August 13, 2009

हाफ्ता बंद

कोण म्हणता पुरूष रडत नाही?? मी गेले काही दिवस दर बुधवार अन् गुरुवारी पुरूष रडताना बघतोय. झी मराठीवर 'हाफ्ता बंद नावाचा प्रोग्रॅम सुरू झालाय. तसा आधी कौन बनेगा करोडपती,दस का दम, छप्पर फाडके असे अनेक कार्यक्रम सुरू झले न बंद ही पडले..दस का दम चा दुसर पर्व सुरू झाला पण त्यात केवळ सेलेब्रिटीस येत आहेत ..सलमान खान सोबत नाच करतायेट आणि निघून जात आहेत...म्हणजे ज्यांच्या कडे आधीपासूनच कोट्यावधी रुपये आहेत ते केवळ टी आर पी वाढवण्यासाठी येऊन जात अहेत. असल्या प्रोग्रॅम चा सामन्या जनते साठी उपयोग काय ?? "हाफ्ता बंद " हा कार्यक्रम बघितल्यावर सत्या परिस्थिती कळते. गरज लोकांना काय काय करायला लावते हे कळता..अहो 1 कोटी वगेरे खूप लांबची गोष्टा आहे पण लोकांना 1 लाखाचा कर्ज फेडताना सुधा नाकी नउ आलेत...इथे येणारा माणूस त्या होस्ट ला भेटायला किंवा बघायला आला नसून सुखाची झोप घ्यायला येतो...मन्दि च्या काळात नोकरीची गॅरेंटी नसताना घरासाठी घेतलेला 15 लाखाचा कर्ज,नुकताच नवीन लग्ना झालेली जोडपी..नुकतेच पालक झालेल दांपत्या या लोकांनी समाधानाने झोपायचा,लहान मुलान्शि खेळायचा की कर्जाचा विचार करत राहायचा..त्यांच्या जागेवर स्वतःला इमॅजिन करून जरी बघितला तरी अंगावर काटा येतो... चैनी साठी कर्ज घेणारे अनेक लोका आहेत,कार लोन .टॅक्स वाचवण्यासाठी घेतलेला लोन..पण पोटासाठी,आपल्या कुटुंबाला सुखाने झोप लागावी म्हणून घर घेऊन स्वता कर्ज घेऊन रात्रभर जागा राहणार्‍या माणसा कडे बघून खरच कीव येते..आपण नेहमी आपल्या पेक्षा पुढे किंवा वरच्या पातळीवर च्या माणसा शी आपली तुलना करतो तेव्हा आपल्याकडे काय कमी आहे ह्याची जाणीव होते आणि आपण नेहमी ते मिळवण्या च्या मागे धावतो...ह्या प्रोग्रॅम मधे येणार्‍या लोकांकडे बघून आपण खरच किती सुखी आहोत हे कळता... ह्या विषयावर अनेक लेख आलेत,पेपर मधे च्ापून आलाय पण रिॅलिटी शो ची खरी गरज कोणाला आहे हे लक्षात आला...स्वाताची विवाहबाह्या संबंध सांगून कुटुंब उधवास्ता करून 1 लाख रुपये मिळवण्यात काय पॉइण्ट आहे?? ते 1 लाख गरजू लोकांना द्या..पुण्या तरी लाभेल...पण पैसा बोलता है बॉस... असले स्फोटक किस्से ऐकून त्याची लोका चर्चा करणार आणि परत परत ते बघणार..कशाला असले लोकांची रडगाणी ऐकत बसतील? कॉन्सेप्ट चांग्लियहे पण झी मराठी गरीब वाहिनी आहे त्यामुळे जिंकून जाणार्यांची संख्या खूप कमी आहे...पण किमान अशा गरजू लोकांच्या मदती साठी कोणीतरी काहीतरी करताय हे बघितल्यवारा खूप छान वाटला..आम्ही आपले घरी बसून लोकांना नुसता नाव ठेवणार..की साध्या प्रश्ना चा उत्तर देता येत नाही..स्वता उठून काही करणा माहीतच नाही आम्हाला...बाहेर स्वाइन फ्लू सुरू आहे...म्हणून आम्ही बाहेर पडायचा नाही..घरी बसून हॉस्पिटल मधे डॉक्टर काय करत आहेत ह्याला नाव ठेवायची...माणुसकी सुधा हप्त्या हप्त्याने बंद होत आहे... आणि मी सुधा फार काही वेगळा करणार नाहीए..ब्लॉग लिहिणार आणि झोपून माझा माणुसकी चा आजचा हाफ्ता बंद करणार...

मी इंजिनीरींग ला का आणि कसा आलो??

12वी पर्यंत आयुष्य हे घर-शाळा-कॉलेज एवढ्यापुरताच मर्यादित होता. अमुक अमुक टक्के किंवा इतका नंबर मिळवला तर अमुक अमुक मिळेल अशा कंडीशन्स मधे सतत शिक्षण झाल.5वी मधे पहिल्या 5 नंबर मधे आलास तर वीडियो गेम,10वी मधे 80-85 पडले तर सायन्स आणि 12वी ग्रूप मधे 90% च्या वरती मिळाले तर इंजिनीरींग (सुदैवाने सी ई टी भानगड आमच्यावेळी नव्हती आमची लास्ट बॅच होती.) लहानपणा पासूनच मला इंजिनीर् व्हायचा होता असा काही नव्हता काही लोकांचा मी बघितलाय की 8 वीतचठरवला होता की मला इंजी किंवा डॉक्टर व्हायचाय. माझ्या मते अशा लोकांना बाकीचे फील्ड्स नाहीतच नसतात आणि त्यातून 90% लोका ठरवलेल्या प्रमाणे होत्ाही नहित.कमि %मिळाले म्हणून बी एस सी नाहीतर बीकॉम करतात.. असो! मुद्दा हा नाहीए की कुणाला काय वाटताय मुद्दा हा आहे की मी इंजिनीर्ईग ला का अन् कसा आलो?? 9वी मधे असताना सायन्स 2 मधे लाइफ प्रोसेसेस या धड्यांमुळे मी बायोलॉजी घेऊन चीर्फाड करणार्‍यांमधला नाही (शाब्दिक चीर् फाड अपवाद आहे .तो अगदी व्यवस्थित जमतो) माझ्या मते आपल्याला काय हवाय यापेक्षा काय नकोय हे जर माहीत असेल तर आयुष्या अधिक आनंदात जगता येईल पण जर सगळाच मना प्रमाणे झाल तर मजा कसली?? ह्ंम्म्म्म्म !!! तर 10वी मधे 86% न 12 वि मधे 92% मिळाल्यावर घराण्याचा वंशा चा दिवा पेटला बाबा एकदाचा अशी घरच्यांची समजूत झाली . असो तर गरवारे कॉलेज मधे अड्मिशन घेऊन एन एम, के एम न खाके असे 3 क्लास लावून 12वी पास झालो..12वि च्या बोर्डाच्या परीक्षेला पहिले 2 पेपर खराब गेल्यावर रात्री वर्ल्ड कप ची मॅच बघून दुसर्या दिवशी पेपर चांगला जाणा म्हणजे अविस्मरणीया आनंद .म्हणजे मॅच पण जिंक्लो आणि पेपर ही चांगला गेला (डीटेल्स: भारत वि इंग्लेंड 2003 च्चा वर्ल्ड कप..आशिष नेहर ने उलट्या करून घेतळेलेल 6 विकेट्स न तेंडुलकरची कॅडिक च्या मुस्काटात मारलेली सिक्स खरच अप्रतिम!!!) मला अजुन कळलेला नाही की ह्या महत्वाच्या मॅचस नेहमी परीक्षेच्या वेळेसच का असतात?? कदाचित त्यावेळी सगळी पोरा घरी असतील अभ्यासासाठी त्यामुळे जास्त प्रेक्षकवर्ग मिळेल आणि उगीच शाळा कॉलेज बुडणार नाही..खरच किती काळजी नवीन पिढीची... 2 पेपर मधे 7 दिवसांची गॅप मिळाल्यावर घरच्यांनी नकार देऊन सुधा क्रिकेट खेळायला गेलो आणि एकलव्यसारखा ज्यांनी आम्हाला गणित शिकवला (मित्रापैईकीच) अशा द्रोणाचार्याला माझा उजवा अंगठा देऊन आलो...एकलव्याला अन् त्याचा फॅमिली ला कसा वाटला असेल ह्याची प्रचीती आली..पण हार न मानता तसाच पेपर लिहून परत क्रिकेट खेळल्यावर फाइट मारण्याचा स्पिरिट त्यावेळी पासूनच रक्तात होता ह्याची खात्री नंतर पटत गेली. रिज़ल्ट लागला अन् इंजिनेरींग ला जाण्याइतपत मार्क होते..तो पर्यंत कॉलेजस कुठली हे सुधा माहीत नव्हता..एम आय टी फक्ता ग्राउंड वर क्रिकेट खेळण्यासाठी (काही जाणा टेकडीवर जायचे..त्याचा कारण नंतर कळला)होता त्यामुळे माहीत होता खरी गंमत तर आता सुरू होणार होती..गंमत कसली 'पर्व' 4 जून 2003ला 12 वी चा निकाल लागला अन् त्यानंतर रोज पेपर मधे शिक्षण मंत्रालय आणि कॉलेजस ह्यांनी "आपली आवड" हा प्रोग्रॅम सुरू केल.रोज काहीतरी नविनच.ओप्तिओन फॉर्म कधी मिळणार?, फी किती असणार??,कॉलेज की ब्रांच?? बघता बघता 3 महिने सुट्ट्यांचे 6 महिन्यात रुपांतर झाले. एम आय टी - 72000/- व्ही आय टी-64,000/- असे लॉटरी च्या बक्षिसचे आकडे फी म्हणून पेपर मधे छापून येऊ लागले... सी ओ ई पी हे प्रतिष्ठीत कॉलेज फक्ता ऑप्षन फॉर्म भरणे ह्यासाठीच बघावे लागणार असे वाटले. ह्या कॉलेज चा मला आधी काही कललच नाही. बस कंडक्टर ला विचारला की सी ओ ई पी ला येणार का?? त्या वेळी त्याने 'हाडूक'(समजून घ्या) दिला... पण नंतर शिवाजीनगर चा इंजिनीरींग कॉलेज म्हणल्यावर टायच्या डोळ्यात एक वेगळाच आदर दिसत होता..मी कृष्णा सारखा गीता ऐकणार का असा अर्जुनाला विचारतोय अन् त्यावेळी अहो विचारतय काय सांगा असा म्हणताना पार्थाच चेहरा जसा झाला होता ना अगदी तसा होता... पु . ला. च्या पुणेकरांचा जाज्वल्य अभिमानाचा प्रत्यय मला आला.. पुण्यात फक्ता एकच इंजिनीरींग कॉलेज आहे ..बाकीच्यांना काहीच हक्का नाहीए स्वताहला पुण्यातला इंजिनीरींग कॉलेज म्हणून घ्यायची..पण हा अभिमान आहे की माज याचा उत्तर मला थोड्याच दिवसांनी मला मिळणारेत असा ते कॉलेज मला ओरडून सांगत होता.. पहिल्या राउंडला सी ओ ई पी मधे अड्मिशन ना मिळलल्याने मूड गेला होता पण त्यातला त्यात फी कमी असल्याने सिंहगड मधे अड्मिशन घेतली ..2 आठवडे त्या गडा वर चढलो अन् लढलो.. अक्टोबर उजाडला..6 अक्टोबर म्हणजे माझा वाढदिवस..त्या दिवशी पेपर मधे 4 त्या राउंड ची नोटीस आली होती...निदान त्या निमित्ताने तरी सी ओ ई पी मधे पाऊल ठेवता येईल म्हणून फॉर्म भरायला गेलो..कदाचित सी ओ ई पी नि दिलेली हाक आणि वाढ दिवसाची भेट असेल.. 2 दिवसांनी 8 अक्टोबर ला राउंड होती..काही अपेक्षा ना ठेवता गेलो होतो..बरेच लोका मेकॅनिकल,कंप्यूटर ब्रांच मिळत नाहीत म्हणून परत येत होते..मला त्याच्याशी काही एक घेणा देणा नव्हता..मला फक्ता सी ओ ई पी हव होता... तेव्हा आतून बातमी आली की सिविल, मेटलर्जी च्या जागा रिकाम्या आहेत असा कळला..पण सगळा आरामात झाला तर मग ते सारकारी कॉलेज कसला...ऐनवेळी बोनफाइड सर्टिफिकेट इस अ मस्ट असा त्या ऑफीसर ने मक्खपणे सांगितला..त्यावेळी त्याला 2 ठेवून त्याचा डेथ सर्टिफिकेट त्यालाच द्यावा असा वाटला ...पण अडला हरी .. हातात 1.5 तास होता..लंच टाइम झाला होता..मग मी अगदी तानाजी च्या आवेषात सिंहगडावर चढाई करायला निघालो. सोबत माझी घोरपड (बजाज एम -50). शिवाजीनगर ते सिंहगड कॉलेज दरम्यान केलेल माझा ड्राइविंग कदाचित आदित्या चोप्रा नि बघितला असेल आणि म्हणूनच त्याला धूम ची आइडिया आली असणार... नॅयेट्रोबूसटर्स लावल्यासारखी माझी गाडी पळत होती .किती निस्वारथी पणेपळत होती बिच्चारी .सी ओ ई पी मधे अड्मिशन मिळाली तर मी नवीन गाडी घेईन आणि हिच्याकडे बघणार सुधा नाही हे माहिती असून सुधा पळत होती...अहााह!!! काय ही स्वामिनिष्टा.. राणप्रताप च्या चेतक घोड्या नंतर माझीच एम 50.. सिंहगडावर पोचलो ..तिथे सरदार आणि मावळे जेवण करत होते..नंतर या असा सांगितला..पण मी सुधा अमिताभ चे सिनेमे बघितले होते..थेट प्रिन्सिपल च्या कॅबिन मधे घुस्लो आणि बोनाफआइड सर्टिफिकेट घेतला..आणि धूम 2 सारखा रिटर्न सी ओ ई पी मधे आलो.. अड्मिशन घेतल्यावर लोकांचा बघण्याचा दृष्टीकोनाच बदलला .."काय करतोस??", "इंजिनीरींग "-मी .समोरचा -"बर,कुठे?" मी-"पुण्यात" , ते- "अरे वा!!"पुण्यात कुठे??, मी- "इंजिनीरींग कॉलेज,शिवाजी नगर", ते-" काय सांगता,भारीच !!!" असे 3 डिग्री 3 वाक्यातून ऐकायला मिळाले.. आणि मग 10 ओक्टॉबेरला एका महान पर्वाची, कुणाचीची पर्वा न करता सगळ्या गोष्टी अगदी परवा घडल्यासारखा वाटणर्‍या गोष्टींची सुरूवात झाली..........